शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:13 AM

ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत

नवी मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत. ग्रामस्थांच्या विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने एप्रिल २००७ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र केली होती. आता पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, या दृष्टीने ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत.डिसेंबर १९९१मध्ये ठाणे जिल्हा परिषदेतील ४५ गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पात समावेश नसलेल्या पारसिक हिलच्या पलीकडील १४ गावांचा यात समावेश होता. त्यानुसार महापालिकेने दहा वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळांची निर्मिती केली; परंतु महापालिका आपल्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेईल, या भीतीने सुविधा आणि कररचनेचा बाऊ करीत ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून महापालिकेतून ही गावे वगळण्याची मागणी केली. या मागणीसाठी रक्तरंजित संघर्ष करण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने ही गावे महापालिकेतून वगळून ती स्वतंत्र केली. त्यामुळे या गावांचा कारभार पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झाला. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपेक्षित विकास साधला जात नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे. १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. या मागणीसाठी आता ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.मागील काही वर्षांत १४ गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या अपुºया उत्पन्नातून या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यास मर्यादा येत आहेत. पाणीपुरवठा, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. गावातील शासकीय गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही १४ गावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी दहिसर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन गजानन पाटील, सदस्य गुरुनाथ मधुकर पाटील यांनी केली आहे.