शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आई मलाही जायचंय शाळेत! चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा हट्ट; काही पालकांची ना, तर काहींना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:39 IST

school : पनवेल तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत.

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ती चौथीपर्यंतच्या मुलांना शाळा सुरू व्हाव्यात असे वाटत आहे. घरी ताई, दादा शाळेत जात आहेत. मलाही शाळेत जायचंय, असा हट्ट चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. पहिली ते चौथीपर्यंतची मुले घरी राहून कंटाळली आहेत; परंतु कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठविण्यास काही पालकांची ना आहे, तर काहींना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.पनवेल तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. घरी राहून ऑनलाइन शिकवणीला मुले कंटाळली आहेत. शाळेतील शिक्षणासोबतच मित्रांसोबत खेळणे, बागडणे, मधल्या सुटीतील डबा पार्टी करणे, खोड्या करणे आदी गोष्टींपासून दूर राहिल्याने शाळा कधी सुरू होतील असा प्रश्न लहान मुलांकडून विचारला जात आहे. मुलांचे मन चंचल असते. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते. खुल्या वातावरणात त्याचा सदुपयोग केला तर लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते; परंतु घरी राहिल्याने लहान मुलांचा कोंडमारा होत असून, लवकर शाळा सुरू कराव्यात, असे काही पालकांकडून सांगण्यात येत आहे.

मुलांना हवी आहे शाळासगळ्यांच्या शाळा सुरू आहेत. आम्हालाच सुटी देण्यात आली आहे. शाळेत सर, मॅडम येतात. ऑनलाइन क्लासचा कंटाळा आला आहे. मलाही शाळेत जायचं आहे; पण शाळा सुरू नाहीत. खूप झाली सुटी आता, शाळा सुरू व्हायला पाहिजेत.-साईराज शितोळे इयत्ता १ ली

मी घरी राहून कंटाळले आहे. मला शाळेत जायचे आहे. बाबा व आई शाळेत जाऊ देत नाहीत. शाळा सुरू झाली नाही असे सांगतात. खूप कंटाळा आला आहे. शाळा कधी सुरू होईल माहीत नाही.-शीतल पवार इयत्ता २ री

शाळा बंद होऊन ११ महिने झाले आहेत. पास झालो आहे की नाही, हेही माहीत नाही. ऑनलाइन क्लासचा कंटाळा आला आहे. घरी दीदी शाळेत जाते. मला मात्र घरी राहावे लागत आहे. मलाही शाळेत जायचं आहे; पण शाळा सुरू नाही ना, काय करणार. घरीच बसावं लागतयं. कधी शाळा सुरू होईल असे वाटते आहे.-प्रेम धनराज पवार इयत्ता ४ थी

पालकांना चिंता....मुले घरी बसून कंटाळली आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. घरी लहान मुले शाळेत जाण्यासाठी हट्ट धरतात. कोरोनाच्या उपाययोजना करून आता लहान मुलांच्या शाळा सुरू करायला हरकत नाही; पण शाळेकडून योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.- मंगेश आढाव, पालक

पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. हे बरोबर आहे. कोरोना आणखी कमी झालेला नाही. पनवेल परिसरात कोरोना रुग्ण सापडत आहेत. लहान मुलांना कोरोनाचा धोका लवकर संभवतो. मुलांना कमी-जास्त झाले तर त्यास जबाबदार कोण? त्यामुळे शाळा सुरू करू नये.-अमोल शितोळे पालक

यंदा लहान मुलांच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष कोरोना काळामुळे संपत आले आहे. दोनच महिन्यांसाठी कशाला शाळा सुरू करायला पाहिजे. जूनपासून शाळा सुरू व्हायला पाहिजेत. अद्याप तरी कोरोना संपत आलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊ नयेत.- राजेश ठाकर पालक

कोरोनाची ताळेबंदी उठल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. आता पनवेल परिसरातील लोकलही सुरू आहेत. त्याचबरोबर परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळा सुरू करू नयेत. जूनपासूनच शाळा सुरू करण्यात याव्यात.चंद्रकांत राऊत पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा