शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माणूस पैसे कमावतो, पण समाधान मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:31 IST

डॉ. प्रकाश आमटे : अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रमात संवाद

 

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबाेली : कोरोनामुळे  सर्व जग ठप्प झाले आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव हा निसर्गाचा नाश केल्यामुळे उद्भवत आहे. आयुष्यात निरपेक्ष जगणे खूप महत्त्वाचे असते. माणूस पैसा कमवतो. पण, त्यातून समाधान मिळत नाही. कोरोना काळात आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. पण त्याचा  काहीच उपयोग करता येत नाही.  पैशांपेक्षा समाधान खूप महत्त्वाचे असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले. अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत फेसबुक लाईव्हवर आदिवासींच्या जीवनातील अंधार  दूर करणारे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दाम्पत्याशी  उत्तरा मोने यांनी संवाद साधला. मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे लोकमत माध्यम प्रायोजक होते. आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करण्याबरोबर अनेक वन्यजीवांना आधार देणारे डाॅ. प्रकाश आमटे  यांनी आपल्या जीवनाच्या खडतर प्रवासाबरोबर आदिवासींच्या  हितासाठी केलेल्या कामांचा उलगडा केला. कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारलेले  बाबा आमटे यांचा वारसा पुढे चालवण्याचे काम मी केले. आयुष्यात निरपेक्ष काम केले की, समाधान आपोआप मिळते. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील भामरागड या घनदाट अरण्य प्रदेशात आदिवासींची सेवा करण्यास सुरुवात केली. शेकडो मैल अंतर पायी तुडवत, नदी - नाले ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालून आदिवासींची सेवा सातत्याने सुरूच ठेवली. आरोग्याबरोबर शिक्षणालाही महत्व होते. त्यामुळे आदिवासींचे अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण आवश्यक होते. त्यानुसार प्रयत्नही  केले. सत्ता माणसाला भ्रष्ट करते. निरपेक्षपणे काम करत राहाणे महत्त्वाचे असल्याचे आमटे यांनी सांगितले.

प्रेमाची भाषा प्राण्यांना जवळची nप्राणी आणि  आदिवासी यातील काय  फरक जाणवला. या बाविस्कर ग्रुपचे संचालक प्रकाश बाविस्कर यांनी विचारलेल्या  प्रश्नाला उत्तर देताना आमटे म्हणाले, की  प्रेमाची भाषा सर्वांनाच जवळची वाटते. त्यामुळे प्राणी आणि मनुष्याशी  माझी नाळ जुळली गेली. माकडाच्या पिल्लांची शिकार करुन आदिवासी आपली उपजीविका भागवत. असे लक्षात आल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन शिकार न करण्यास भाग पाडले. त्या बदल्यात त्यांना तांदूळ दिले आणि माकडाचे पिल्लू घरात ठेवले. आदिवासी  अनेकदा जंगलात सापडलेली अनाथ  पिल्ले ते माझ्याकडे आणून देत होते. nअसे करत माझ्याजवळ मोर, वाघ, शेकरू, अस्वल, हरीण यांची भर पडत गेली. त्याचबरोबर बिबट्याच्या बाळंतपणाचा किस्सा त्यांनी  सांगितला. प्रेरणा घेऊन अनेक तरुण काम करत आहेत.