शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:36 IST

शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील मॉल सहा महिन्यांनी पुन्हा एकदा सुरू होऊनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे लॉकडाऊनपूर्वी नेहमी गजबजलेले मॉल ओस पडल्याचे दिसून येत आहेत. सहा महिन्यांतील तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी मॉलमधील व्यावसायिकांनी किमतीमध्ये सवलती देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने, अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत.शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. त्यानंतर, शहरातील वाढत्या मॉलमुळे खरेदीदारांमध्ये मॉल संस्कृती तयार झाली होती, तर मॉलमधील इतर मनोरंजनाची साधने, फूड कोर्ट यामुळे सहज फेरफटका मारणाऱ्यांकडून नकळत खरेदी केली जायची. त्यात तरुण-तरुणींचा अधिक समावेश असायचा. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केल्याने मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्सचे शटर नुकतेच उघडले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेत, व्यवसाय करण्यास मॉल व्यवस्थापनांना प्रशासनाने अनुमती दिली आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा सर्व मॉल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मॉलमधील दुकाने आहे, त्या स्थितीत बंद राहिल्याने, त्यामधील मालाचे नुकसान होऊ लागले होते. त्यात कपडे व लेदरचे साहित्य असलेल्या व्यावसायिकांचा समावेश होता. यामुळे पुन्हा एकदा मॉल सुरू झाल्याने, सहा महिन्यांत झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न मॉलमधील व्यावसायिकांकडून सुरू आहे, परंतु नवी मुंबईत अद्यापही कोरोना अपेक्षित असा नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे मॉल सुरू होऊनही त्या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध वस्तूंच्या किमतीवर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. ३० ते ५० टक्क्यांपर्यंतच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही तुरळक ग्राहक खरेदीसाठी येत असल्याची खंत व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. एक ते दीड लाख रुपये भाड्याने अनेक व्यावसायिकांनी मॉलमधील जागा घेतल्या आहेत. त्यामुळे किमान भाडे तरी नफ्यातून सुटावे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.फूड कोर्ट बंदच : मॉलमधील बैठक व्यवस्था हटविण्यात आली आहे, तर फूड कोर्टही बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळेही मॉलकडे वळणारे पाय कमी झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायांवर दिसून येऊ लागला आहे. अशीच परिस्थिती अधिक काही काळ राहिल्यास शहरात उदयास आलेली मॉल संस्कृती मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस