शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 2:14 AM

चाकारमान्यांना गावच्या नेत्यांचे साकडे; नवी मुंबई, मुंबईतील मतदानावर परिणामाची शक्यता

- नामदेव मोरे नवी मुंबई : संपूर्ण राज्यात एकाच टप्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे दुबार मतदान होण्याचा धोका टळला आहे. चाकरमान्यांना गावाकडे यावे यासाठी स्थानिक नेत्यांनी साकडे घालण्यास सुरवात केली आहे. यामुळे यावेळीही मतदारांची पळवापळवी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे नवी मुंबई, मुंबईसह ठाणे परिसरातील काही मतदार संघातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये २०१४ च्या लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावाकडे मतदान करा व नंतर मुंबईत येवून येथेही मतदान करा असे आवाहन केले होते. दुबार मतदानासाठी केलेल्या आवाहनामुळे खळबळ उडाली होती. वास्तवीक कोकण व पश्चिीम महाराष्ट्रामधील नागरिकांची मुंबईमध्येही मतदार यादीमध्ये नावे असून मुळ गावाकडील मतदार संघामध्येही अनेकांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. याशिवाय अनेक मुंबईकर गावाकडे कार्यकर्त्यांची भुमीका बजावत असतात.दोन पेक्षा जास्त टप्यात मतदार झाले की काहीजण गावाकडे जावून मतदार करतात व पुन्हा मुंबईमध्ये येवून मतदार करत असतात. परंतु विधानसभा निवडणुका एकाच टप्यात होणार असल्यामुळे आता दोन ठिकाणी नावे असली तरी मतदान एकाच ठिकाणी करता येणार आहे.या मतदार संघात प्राबल्यसातारा जिल्ह्यातील सातारा,वाई, माण, पाटण, कोरेगाव मतदार संघामध्ये मुंबईमधील चाकरमान्यांचे प्राबल्य आहे. सांगलीमधील शिरूर, पुणे जिल्ह्यामधील भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर मतदार संघामध्ये मुंबईतून जाणारे कार्यकर्ते व मतदारांची भुमीका महत्वाची असते.या मतदार संघावर होणार परिणाम मतदारांचे स्थलांतर झाल्यास नवी मुंबईमधील ऐरोली, बेलापूर, पनवेल या मतदार संघातील मतदानावर परिणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या येथील उमेदवारांना स्थलांतर रोखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.झालेले मेळावेलोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नवी मुंबईमधील संपर्क वाढविला आहे. यामध्ये सातारा मतदार संघाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमीत कदम, भोर चे आमदार संग्राम थोपटे, शिरूर मतदार संघातील काही नेत्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेतले आहेत.गावाकडे झालेल्या मेळाव्याला मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांना आग्रहाने बोलावून घेण्यात आले होते. रविवारी २२ सप्टेंबरला सातारामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही नवी मुंबईमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019