शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 02:14 IST

चाकारमान्यांना गावच्या नेत्यांचे साकडे; नवी मुंबई, मुंबईतील मतदानावर परिणामाची शक्यता

- नामदेव मोरे नवी मुंबई : संपूर्ण राज्यात एकाच टप्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे दुबार मतदान होण्याचा धोका टळला आहे. चाकरमान्यांना गावाकडे यावे यासाठी स्थानिक नेत्यांनी साकडे घालण्यास सुरवात केली आहे. यामुळे यावेळीही मतदारांची पळवापळवी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे नवी मुंबई, मुंबईसह ठाणे परिसरातील काही मतदार संघातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये २०१४ च्या लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावाकडे मतदान करा व नंतर मुंबईत येवून येथेही मतदान करा असे आवाहन केले होते. दुबार मतदानासाठी केलेल्या आवाहनामुळे खळबळ उडाली होती. वास्तवीक कोकण व पश्चिीम महाराष्ट्रामधील नागरिकांची मुंबईमध्येही मतदार यादीमध्ये नावे असून मुळ गावाकडील मतदार संघामध्येही अनेकांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. याशिवाय अनेक मुंबईकर गावाकडे कार्यकर्त्यांची भुमीका बजावत असतात.दोन पेक्षा जास्त टप्यात मतदार झाले की काहीजण गावाकडे जावून मतदार करतात व पुन्हा मुंबईमध्ये येवून मतदार करत असतात. परंतु विधानसभा निवडणुका एकाच टप्यात होणार असल्यामुळे आता दोन ठिकाणी नावे असली तरी मतदान एकाच ठिकाणी करता येणार आहे.या मतदार संघात प्राबल्यसातारा जिल्ह्यातील सातारा,वाई, माण, पाटण, कोरेगाव मतदार संघामध्ये मुंबईमधील चाकरमान्यांचे प्राबल्य आहे. सांगलीमधील शिरूर, पुणे जिल्ह्यामधील भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर मतदार संघामध्ये मुंबईतून जाणारे कार्यकर्ते व मतदारांची भुमीका महत्वाची असते.या मतदार संघावर होणार परिणाम मतदारांचे स्थलांतर झाल्यास नवी मुंबईमधील ऐरोली, बेलापूर, पनवेल या मतदार संघातील मतदानावर परिणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या येथील उमेदवारांना स्थलांतर रोखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.झालेले मेळावेलोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नवी मुंबईमधील संपर्क वाढविला आहे. यामध्ये सातारा मतदार संघाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमीत कदम, भोर चे आमदार संग्राम थोपटे, शिरूर मतदार संघातील काही नेत्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेतले आहेत.गावाकडे झालेल्या मेळाव्याला मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांना आग्रहाने बोलावून घेण्यात आले होते. रविवारी २२ सप्टेंबरला सातारामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही नवी मुंबईमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019