शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अर्थकारणासाठी सत्तासोपानाची लढाई, विधानसभा, मनपांसाठी भाजपची कल्याण-ठाणे मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

By नारायण जाधव | Updated: April 6, 2024 13:19 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत.

- नारायण जाधवनवी मुंबई - राज्यात सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत. असे असताना या जिल्ह्यात भाजपला शत - प्रतिशत सत्ता मिळविता आलेली नाही. लोकसभेच्या निमित्ताने ठाणे किंवा कल्याण एक मतदारसंघ भाजपला हवा आहे. हे केवळ  लोकसभेपुरते मर्यादित नाही. तर  जिल्ह्यातील १८ विधानसभा आणि सहा महापालिकांची सत्ता काबीज करण्यासाठी ताणलेली बंदूक आहे.

एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या दिग्गजांनी पूर्वीच्या एकसंघ ठाणे लाेकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. नंतरच्या काळात शिवसेनेच्या आनंद दिघे यांनी कौशल्याच्या बळावर ठाण्याचा गड सर केला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कल्याण आणि भिवंडी हे मतदारसंघ निर्माण झाले. परंतु, येथे भिवंडीवगळता दोन्हीकडे शिवसेना सरस ठरली आहे. विशेषत: ठाणे शहरात पक्षाची ताकद कमी आहे. मात्र, याच मतदारसंघातील मीरा - भाईंदर महापालिका आणि नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या बळावर भाजपची सत्ता आहे. मीरा - भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपचेच आमदार आहेत. यामुळे या खेपेला ठाण्याचा खासदार भाजपचाच असावा, असा आग्रह त्या पक्षाच्या श्रेष्ठींचा आहे. 

ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहेत. त्यांचा कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ठाण्यात भाजपचे संजय केळकर आमदार आहेत, तर मीरा - भाईदरमध्ये गीता जैन,  नवी मुंबईतील ऐरोलीत गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे आमदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. येथील विधानसभांमध्ये भाजपचे  वर्चस्व आहे. तरीही कल्याण - डोंबिवलीत भाजपला स्वबळावर महापालिका काबीज करता आलेली नाही.

मोठी गुंतवणूक असलेले ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प१सध्या ठाणे जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील १.१० लाख कोटींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासह नॅशनल हायवे ऑथारिटीचा जेएनपीटी ते दिल्लीपर्यंतचा मुंबई - दिल्ली महामार्ग, जेएनपीटी ते दिल्लीपर्यंतचा फ्रेट काॅरिडॉर हे मोठे प्रकल्प सुरू आहेत.२ एमएमआरडीएकडून १७,७०० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एमएसआरडीसीचा ५५ हजार कोटींचा विरार - अलिबाग प्रकल्प  आकार घेत आहे. एमएआरडीएचे ग्रोथ सेंटर, ठाणे जिल्ह्यात नव्या एमआयडीसी आकार घेणार आहेत. समृद्धीवरील दोन ग्रोथ सेंटर ठाणे जिल्ह्यातच येणार आहेत.३ ठाणे-कासारवडवली - भिवंडी - कल्याण - तळोजा हे मेट्रो प्रकल्प, मीरा - भाईंदर ते ठाणे मेट्रोंसह मोघरपाडा, कशेळी, मुर्धा येथे कारशेड बांधण्यात येणार आहेत. ४ ठाणे, नवी मुंबई या दोन महापालिकांचे बजेट पाच हजार कोटींच्या घरात आहे, तर कल्याण - डोंबिली, मीरा - भाईंदर यांचे बजेट दोन ते अडीच हजार कोटींचे, भिवंडी, उल्हासनगर यांचे हजार ते दीड हजार कोटींचे बजेट आहे.५ भिवंडीच्या गोदाम पट्ट्यात लॉजिस्टिक पार्कचे प्रकल्प येऊ घातले आहेत.६ या पट्ट्यात कोट्यवधींची गुंतवणूक असून, याच परिसरात शापूरजी पालनजी, लोढा, रुस्तमजी, रुणवाल, पॅराडाईज, टाटा यांसारख्या विकासकांच्या टाऊनशिपही आकार घेत आहेत. यामुळे अर्थकारणासह आगामी विधानसभा आणि महापालिकांमध्ये सत्तासोपानावर चढण्यासाठी ठाणे-कल्याणची खासदारकी महत्त्वाची असल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांत ते मतदारसंघ पदरात पाडण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. हे नुसते राजकारणच नसून अर्थकारणही आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाthaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४