शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:14 IST

Maharashtra Election 2019: चुरशीची लढत : अंतिम टप्प्यातील प्रचार आला रंगात; सभा, बैठकांना वेग

पेण : पेण मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी अशी चुरशीची लढत पाहावयास मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथील झालेली प्रचारसभा भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या समर्थकांसाठी प्रोत्साहित करणारी ठरली. भाजपमध्ये इनकमिंग वाढले. रवींद्र पाटील यांचे संपूर्ण कुटुंब मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारात सहभागी होऊन जागोजागी चौक सभा, घरोघरी मतदारांशी गाठीभेटी घेत आहे.

एकूणच त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान आ. धैर्यशील पाटील यांचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सतर्क झाले असून आपल्या हक्काचा गडकोट कायमचा आपल्यापाशी राहावा यासाठी नियोजनपूर्वक काम करून परिश्रम घेताना दिसतात. तर धैर्यशील पाटील यांच्या पत्नीही प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचाराला पेण मतदारसंघात वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सामना एकतर्फी वाटत होता. मात्र, तो तसा न राहता वातावरण बदलले आहे. आता स्टारप्रचारकांच्या सभा नसल्याने स्थानिक मुद्दे प्रचारात आले आहेत. युती आघाडीचे कार्यकर्तेच आता उर्वरित दोन दिवस आपआपल्या गावात, शहरात, वार्डात, वाडी, वस्त्यांवर जे कार्यकर्ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत झटून कामे करत आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या खात्यात भरभरून मतदान कसे होईल, यासाठी परिश्रम घेत आहेत. शहरी भागात मतदार आपली निवड ओळखून मत देतो तर गावाकडे प्रत्येक पक्षाचा पारंपरिक चाहता वर्ग असतो. ते सर्व सामान्य मतदार पक्षनिष्ठा ठेवून मतदान करतात.

युती व आघाडी उमेदवार एकमेकांना टक्कर देत असताना या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने पारंपरिक काँग्रेस पक्षाच्या हात या निशाणीवर किती मतदान होते, यावर या लढतींचे खरे चित्र अवलंबून आहे. त्याचबरोबरीने एकाच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा किती स्कोअर होतो, नोटा व इतर राजकीय पक्ष बसप व अपक्ष असे या रणांगणात उभे राहिलेले १२ उमेदवार आहेत. त्यांना किती स्कोअर मिळतो, या सर्व बाबी पाहता एकूण तीन लाख १९ हजार २३८ मतदानापैकी होणारी मतदानाची टक्केवारी, मतदारांचा प्रतिसाद या सर्व बाबींवर उमेदवार व त्यांचे समर्थक बेरीज व वजाबाकीचे गणित जुळवून मॅजिक फिगरची आकडेवारी निश्चित करण्यात मग्न झाले आहेत.

प्रत्येक दिवशी बदलत जाणारे राजकीय वातावरण निर्मिती उमेदवारांची धाकधूक वाढवित आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मतदार कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात, अशा तरंगत्या मतदारांच्या २० टक्के गटाला कोण जिंकला, कोण हरला, याचे देणे-घेणे नाही. अशा मतदारांना रिचार्ज करणे क्रमप्राप्त ठरते. अशाची संख्या आता जागोजागी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. त्यांची मते निर्णायक ठरू शकतात, यासाठी कार्यकर्ता सतर्क झाले आहेत. हे २० टक्के मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचाराला प्राधान्य

एकंदर ४८ तासांचा अवधी प्रचारदौरा पूर्ण करण्यासाठीची डेटलाइन आहे. तर पुढील ४८ तास मतदारांशी गुप्तगू करण्यासाठीचे आहेत. मतदानाची टक्केवारी वाढल्यास निकाल चमत्कारिक लागणारा ठरेल. मात्र, ज्या बाजूकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे तेच जोरदार लढाई करून बाजी पणाला लावतात. या मतदारसंघात नाही लाट, नाही राष्ट्रवादाचा मुद्दा, आपली भाकरी आपणच कमावली पाहिजे, असा श्रमिक मतदार आहे. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का या घोषणा ऐकण्याची सवय राहिली नाही. टीव्हीवरच्या बातम्यांमधून राज्यभरात काय चाललेय याची माहिती मतदारांना मिळते. त्यामुळे गाव बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचाराला मतदारसंघात प्राधान्य दिले आहे.

 

टॅग्स :pen-acपेणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019