शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:08 IST

अनधिकृत फेरीवाल्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : कोरोनाचे सुरू असलेले थैमान थांबविण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असले, तरी प्रत्यक्षात याची कडक अंमलबजावणी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलीस व मनपा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही, तर लॉकडाऊनचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पालिका व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली नव्हती. पामबीच रोड व मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते, परंतु अंतर्गत रोडवर पेट्रोलिंग केले जात नव्हते. परिणामी, नागरिक विनाकारण घराबाहेर पडत राहिले व रुग्ण वाढले. शनिवारपासून पुन्हा दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद केली जाणार आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच नवी मुंबईमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवरही कडक कारवाई होत नाही. पुढील दहा दिवसांत काटेकोरपणे अंमलबजावणी केली, तरच कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.एपीएमसी सुरूच राहणारएपीएमसी मार्केटमध्ये रोज २० ते २५ हजार नागरिक नोकरी, व्यवसाय, खरेदीसाठी येत आहेत. मार्केटमुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. यामुळे एपीएमसी सुरू ठेवून उर्वरित शहर बंद ठेवण्यात काहीही अर्थ नाही. एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी ही बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनकोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले, तरच या उपाययोजनांना यश येणार आहे. नियमांचे पालन केले नाही, तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.10,000 च्या दिशेने वाटचालनवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन दोनशेपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ थांबविली नाही, तर जुलै अखेरपर्यंत नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने आता शासन व महानगरपालिकेवर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस