शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:08 IST

अनधिकृत फेरीवाल्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : कोरोनाचे सुरू असलेले थैमान थांबविण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असले, तरी प्रत्यक्षात याची कडक अंमलबजावणी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलीस व मनपा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही, तर लॉकडाऊनचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पालिका व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली नव्हती. पामबीच रोड व मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते, परंतु अंतर्गत रोडवर पेट्रोलिंग केले जात नव्हते. परिणामी, नागरिक विनाकारण घराबाहेर पडत राहिले व रुग्ण वाढले. शनिवारपासून पुन्हा दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद केली जाणार आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच नवी मुंबईमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवरही कडक कारवाई होत नाही. पुढील दहा दिवसांत काटेकोरपणे अंमलबजावणी केली, तरच कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.एपीएमसी सुरूच राहणारएपीएमसी मार्केटमध्ये रोज २० ते २५ हजार नागरिक नोकरी, व्यवसाय, खरेदीसाठी येत आहेत. मार्केटमुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. यामुळे एपीएमसी सुरू ठेवून उर्वरित शहर बंद ठेवण्यात काहीही अर्थ नाही. एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी ही बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनकोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले, तरच या उपाययोजनांना यश येणार आहे. नियमांचे पालन केले नाही, तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.10,000 च्या दिशेने वाटचालनवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन दोनशेपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ थांबविली नाही, तर जुलै अखेरपर्यंत नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने आता शासन व महानगरपालिकेवर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस