शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 06:59 IST

बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे 'मेगा'हाल झाले. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे 'बेस्ट' व 'एनएमएमटी' बसथांब्यांवरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहोचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान वाहतूक सुरळीत होती; परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा चुनाभट्टी येथे रुळावर पाणी साचल्याने सकाळी बंद केली होती. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकल सेवा सुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जाऊन एसटी, बेस्ट व एनएमएमटीचा आधार घेतला.

एनएमटीच्या ३७० बसद्वारे वाहतूक

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमटी) ३७० बस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बस पाठविण्याचे नियोजन केले होते; पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पोहोचते; परंतु सोमवारी एक ते दीड तास उशिरा पोहोचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.

रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने हार्बर मार्गावरील पनवेल, बेलापूर, नेरूळ, वाशी रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ही सेवा पनवेलहून वाशीपर्यंतच धावत होती तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवासुद्धा विलंबाने धावत होती.

वाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात पोहोचता आले नाही -सुधाकर माने, नेरूळ

कल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती -विजय देशमुख, कल्याण

'एनएनएमटी'च्या ३७० बस विविध मार्गावर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बस वेळेवर पोहोचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला - योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी

विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहोचलो; पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले चंद्रकांत दळवी, विरार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊसHarbour Railwayहार्बर रेल्वेBESTबेस्ट