शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 06:59 IST

बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे 'मेगा'हाल झाले. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे 'बेस्ट' व 'एनएमएमटी' बसथांब्यांवरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहोचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान वाहतूक सुरळीत होती; परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा चुनाभट्टी येथे रुळावर पाणी साचल्याने सकाळी बंद केली होती. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकल सेवा सुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जाऊन एसटी, बेस्ट व एनएमएमटीचा आधार घेतला.

एनएमटीच्या ३७० बसद्वारे वाहतूक

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमटी) ३७० बस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बस पाठविण्याचे नियोजन केले होते; पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पोहोचते; परंतु सोमवारी एक ते दीड तास उशिरा पोहोचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.

रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने हार्बर मार्गावरील पनवेल, बेलापूर, नेरूळ, वाशी रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ही सेवा पनवेलहून वाशीपर्यंतच धावत होती तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवासुद्धा विलंबाने धावत होती.

वाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात पोहोचता आले नाही -सुधाकर माने, नेरूळ

कल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती -विजय देशमुख, कल्याण

'एनएनएमटी'च्या ३७० बस विविध मार्गावर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बस वेळेवर पोहोचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला - योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी

विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहोचलो; पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले चंद्रकांत दळवी, विरार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊसHarbour Railwayहार्बर रेल्वेBESTबेस्ट