शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 06:59 IST

बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे 'मेगा'हाल झाले. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे 'बेस्ट' व 'एनएमएमटी' बसथांब्यांवरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहोचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान वाहतूक सुरळीत होती; परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा चुनाभट्टी येथे रुळावर पाणी साचल्याने सकाळी बंद केली होती. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकल सेवा सुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जाऊन एसटी, बेस्ट व एनएमएमटीचा आधार घेतला.

एनएमटीच्या ३७० बसद्वारे वाहतूक

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमटी) ३७० बस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बस पाठविण्याचे नियोजन केले होते; पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पोहोचते; परंतु सोमवारी एक ते दीड तास उशिरा पोहोचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.

रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने हार्बर मार्गावरील पनवेल, बेलापूर, नेरूळ, वाशी रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ही सेवा पनवेलहून वाशीपर्यंतच धावत होती तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवासुद्धा विलंबाने धावत होती.

वाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात पोहोचता आले नाही -सुधाकर माने, नेरूळ

कल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती -विजय देशमुख, कल्याण

'एनएनएमटी'च्या ३७० बस विविध मार्गावर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बस वेळेवर पोहोचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला - योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी

विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहोचलो; पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले चंद्रकांत दळवी, विरार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊसHarbour Railwayहार्बर रेल्वेBESTबेस्ट