शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नवी मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत; वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:58 PM

ऐरोलीत झाडे उन्मळून पडली; भुयारी मार्गात साचले पाणी

नवी मुंबई : शहरात मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. ऐरोली नोड, घणसोली गवळीदेव डोंगर परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने तारा तुटण्याच्या घटना घडल्याने घणसोली, गोठीवली, तळवली, नोसिल नाका आणि ऐरोली येथे वीज पुरवठा खंडित झाला होता. तर वाशीत सेक्टर १० येथे ३ ते ४ फूट पाणी साचले होते.ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयासमोरील उद्यानातील एक झाड, तसेच सेक्टर १५ येथील अक्षय सोसायटी आणि दक्षिण सोसायटी जवळ दोन झाडे अशी एकूण तीन झाडे उन्मळून पडली. परिसरात मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागले. ऐरोलीत झाडे उन्मळून पडल्याने अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे मशीनच्या साहाय्याने कापून वाहतुकीचा मार्ग खुला करून दिला.कोपरखैरणे, रबाळे, घणसोली आणि ऐरोली रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातही पाणी साचल्याने वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली होती. घणसोली गावातील चिंचआळी, ताराई नगर, कौलआळी स्मशानभूमी रोड आणि बाळाराम वाडी परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. येथील महापालिकेचे गुणानी तलाव ओसंडून वाहू लागल्याने रस्ता पाण्याखाली गेला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस