शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
3
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
4
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
5
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
6
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
7
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
8
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
9
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
10
विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?
11
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
13
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
14
मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले
15
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
16
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
17
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
18
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
19
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
20
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत किरकोळ कारणांवरून वारंवार हाेताहेत जीवघेणे हल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:55 IST

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सराईत गुन्हेगारांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान असतानाच अनपेक्षितपणे घडणारे गुन्हेही पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. एखाद्या किरकोळ प्रसंगातदेखील अपहरण, वार असे प्रकार घडत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीही अशा प्रसंगात अडकून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना डोक्यावर बर्फ अन् तोंडात  साखर ठेवूनच बाहेर पडणे योग्य, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातावेळी दीपक खेडकर यांनी कारच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी ट्रकचालकाचे अपहरण करून त्याला पुण्याला नेले होते. यावरून रस्त्यांवर अनपेक्षित घडणाऱ्या घटनांना कशा प्रकारे गुन्हेगारी वळण लागत आहे, याचेही दर्शन घडत आहे. रस्त्यांवर होणारे वाद मुंबई, नवी मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. वाहतूककोंडी, बेशिस्त चालक, सिग्नल तोडण्याची घाई यामध्ये सतत वाद होतच असतात. 

हॉर्न वाजवल्याने चाकूहल्लावाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात यापूर्वी सिग्नलवर उभ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या दुचाकीने हॉर्न वाजवून हटण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून एकाला चाकूने भोकसल्याची घटना घडली होती. मागील चार वर्षांत अशा प्रकारे हाणामारी, हल्ल्याच्या सहा सात घटना नवी मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग वाहनाला वाहन घासल्याने शिवीगाळ, मारहाण यावरून येणाऱ्या तक्रारीचेही प्रमाण अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महिलेच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिल्याने महिलेने कारमधील व्यक्तींना जाब विचारला असता त्यांनी थेट महिलेचा विनयभंगच केल्याचा प्रकारही घडला. घराबाहेर निघणाऱ्या बहुतांश व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक तणावात असतात. त्यात रस्त्यांवरील परिस्थितीमुळे त्यांचा पारा अधिक चढून असे प्रकार घडत आहेत. परिणामी अशा व्यक्तींवरही गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरही गुन्हेगारीचा ठपका बसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Petty Disputes Escalating into Deadly Attacks in Navi Mumbai: Report

Web Summary : Minor incidents in Navi Mumbai are increasingly leading to serious crimes like assault and abduction. Road rage incidents, triggered by traffic disputes and reckless driving, often escalate into violence. Police face challenges as even ordinary citizens get caught in legal troubles due to heightened tensions.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी