शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

करावे गावातील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:43 IST

नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे. करावे गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना मासेमारी करण्यासाठी पामबीच मार्ग ओलांडून खाडीकडे ये-जा करावी लागते. पामबीच मार्ग ओलांडताना आजवर अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या लढ्यानंतर पालिकेने या मार्गाखालून भुयारी मार्ग बांधण्यास सुरु वात केली असून या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भुयारी मार्गामुळे मासेमारी करणाऱ्या नागरिकांना पामबीच मार्ग ओलांडणे सुकर झाले असून मोठा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहर हे नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसले आहे. या प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून करावे गावातील बहुतांश नागरिकांचा आजही मासेमारी हा व्यवसाय आहे. या नागरिकांना मासेमारी करण्यासाठी खाडीच्या दिशेने ये-जा करावी लागते. गाव आणि खाडी यांच्यामध्ये असणारा पामबीच मार्ग ही ग्रामस्थांची मोठी समस्या बनली होती. पामबीच मार्गावरून भरधाव वेगाने धावणाºया वाहनांना चुकवीत रस्ता ओलांडताना या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये काही ग्रामस्थांना इजा झाल्या तर काही ग्रामस्थांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. करावे गावातून पाम बीच मार्गाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा देखील केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी देखील भुयारी मार्गासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. सभागृहात भुयारी मार्ग बनविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील पालिका प्रशासन कामाला विलंब करीत असल्याने नगरसेवक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करावे ग्रामस्थांनी पामबीच मार्गावर रास्ता रोको करून पालिका मुख्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर प्रशासनाने या कामाची निविदा काढली होती. परंतु पामबीच मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि जवळ आलेला पावसाळा यामुळे वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्गाचे काम पावसाळा संपल्यावर सुरू करावे अशी सूचना करीत परवानगी नाकारली होती.पामबीच मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविण्यासाठी मार्ग बनविण्यात आला होता. सदर भुयारी मार्गाचे काम करताना १७00 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन अडथळा ठरत असल्याने देखील या कामाला विलंब झाला. पाण्याची पाइपलाइन देखील स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. आता या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भुयारी मार्गामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.