शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:16 IST

CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे.

नवी मुंबई : कल्याण व भिवंडी क्षेत्रातील लाखो प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या कळवा-ऐरोली दुहेरी उन्नत रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. परंतु सिडकोने यात सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी क्षेत्रफळाची जागा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनला अर्थात एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. लाखो रेल्वे प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन कळीचा मुद्दा ठरला आहे. सिडकोकडून अपेक्षित जमीन हस्तांतरित न झाल्याने हा प्रकल्प रखडल्याची बाब खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच सिडकोने तातडीने कार्यवाही करीत दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा एमआरव्हीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्नत मार्गासाठी वर्ग करण्यात येणाऱ्या दिघा येथील जमिनीचा कोणताही आराखडा सिडकोने तयार केलेला नाही. त्यामुळे सदर जमिनीचा समावेश नॉन नोडल क्षेत्रात करण्यात आला आहे. या जमिनीचा बहुतांश भाग प्रादेशिक उद्यान क्षेत्र आणि काही भाग निवासी क्षेत्रात मोडतो. त्यामुळे सदरची ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ऐरोली उन्नत मार्गासाठी ९० वर्षांच्या भाडेकरारावर एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी प्रति चौरस मीटर २२,५०० रुपये दराने २ कोटी ६ लाख ७७ हजार पाचशे रुपये इतके मूल्य सिडकोने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी एमआरव्हीसीकडून भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नियमानुसार सुधारित दर लागू केले जातील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकाचा फेरा मारावा लागतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कसारा ते कल्याण आणि वांगणी ते कल्याणपर्यंतच्या लाखो प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाण्यात जाऊन लोकल बदलावी लागते. त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१५ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. विशेषत: सिडकोकडून अपेक्षित जमीन एमआरव्हीसीकडे वर्ग न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. परंतु सिडकोने आता हा तिढासुध्दा सोडविला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सिडकोचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. ऐरोली उन्नत मार्गामुळे ठाणे रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या परिसरातून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई