शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:16 IST

CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे.

नवी मुंबई : कल्याण व भिवंडी क्षेत्रातील लाखो प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या कळवा-ऐरोली दुहेरी उन्नत रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. परंतु सिडकोने यात सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी क्षेत्रफळाची जागा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनला अर्थात एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. लाखो रेल्वे प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन कळीचा मुद्दा ठरला आहे. सिडकोकडून अपेक्षित जमीन हस्तांतरित न झाल्याने हा प्रकल्प रखडल्याची बाब खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच सिडकोने तातडीने कार्यवाही करीत दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा एमआरव्हीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्नत मार्गासाठी वर्ग करण्यात येणाऱ्या दिघा येथील जमिनीचा कोणताही आराखडा सिडकोने तयार केलेला नाही. त्यामुळे सदर जमिनीचा समावेश नॉन नोडल क्षेत्रात करण्यात आला आहे. या जमिनीचा बहुतांश भाग प्रादेशिक उद्यान क्षेत्र आणि काही भाग निवासी क्षेत्रात मोडतो. त्यामुळे सदरची ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ऐरोली उन्नत मार्गासाठी ९० वर्षांच्या भाडेकरारावर एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी प्रति चौरस मीटर २२,५०० रुपये दराने २ कोटी ६ लाख ७७ हजार पाचशे रुपये इतके मूल्य सिडकोने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी एमआरव्हीसीकडून भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नियमानुसार सुधारित दर लागू केले जातील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकाचा फेरा मारावा लागतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कसारा ते कल्याण आणि वांगणी ते कल्याणपर्यंतच्या लाखो प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाण्यात जाऊन लोकल बदलावी लागते. त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१५ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. विशेषत: सिडकोकडून अपेक्षित जमीन एमआरव्हीसीकडे वर्ग न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. परंतु सिडकोने आता हा तिढासुध्दा सोडविला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सिडकोचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. ऐरोली उन्नत मार्गामुळे ठाणे रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या परिसरातून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई