शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:16 IST

CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे.

नवी मुंबई : कल्याण व भिवंडी क्षेत्रातील लाखो प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या कळवा-ऐरोली दुहेरी उन्नत रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. परंतु सिडकोने यात सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी क्षेत्रफळाची जागा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनला अर्थात एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. लाखो रेल्वे प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन कळीचा मुद्दा ठरला आहे. सिडकोकडून अपेक्षित जमीन हस्तांतरित न झाल्याने हा प्रकल्प रखडल्याची बाब खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच सिडकोने तातडीने कार्यवाही करीत दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा एमआरव्हीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्नत मार्गासाठी वर्ग करण्यात येणाऱ्या दिघा येथील जमिनीचा कोणताही आराखडा सिडकोने तयार केलेला नाही. त्यामुळे सदर जमिनीचा समावेश नॉन नोडल क्षेत्रात करण्यात आला आहे. या जमिनीचा बहुतांश भाग प्रादेशिक उद्यान क्षेत्र आणि काही भाग निवासी क्षेत्रात मोडतो. त्यामुळे सदरची ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ऐरोली उन्नत मार्गासाठी ९० वर्षांच्या भाडेकरारावर एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी प्रति चौरस मीटर २२,५०० रुपये दराने २ कोटी ६ लाख ७७ हजार पाचशे रुपये इतके मूल्य सिडकोने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी एमआरव्हीसीकडून भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नियमानुसार सुधारित दर लागू केले जातील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकाचा फेरा मारावा लागतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कसारा ते कल्याण आणि वांगणी ते कल्याणपर्यंतच्या लाखो प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाण्यात जाऊन लोकल बदलावी लागते. त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१५ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. विशेषत: सिडकोकडून अपेक्षित जमीन एमआरव्हीसीकडे वर्ग न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. परंतु सिडकोने आता हा तिढासुध्दा सोडविला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सिडकोचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. ऐरोली उन्नत मार्गामुळे ठाणे रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या परिसरातून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई