शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:09 AM

पर्यायी पुलाची गरज : अरुंद पुलामुळे अपघाताची शक्यता

मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील केवाळे जवळील अरुंद पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या पुलाला खालील बाजूस असणारे स्टील गंजू लागले असल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पनवेल तालुक्यातील केवाळे गावाजवळ असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता हा पूल बांधण्यात आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पूल देखील आवश्यक आहे. या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पनवेल परिसरात विमानतळ होत असल्याने या परिसराचा कायापालट होताना दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या इमारती व नवनवीन प्रोजेक्ट या परिसरात येत आहेत. मात्र अरुंद पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुलाखालील बांधकामाचे स्टील गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.केवाळे येथील हा जुना पूल पाडून त्याजागी दुसरा मोठा व रु ंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.केवाळे येथील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी व दुसरा पूल बांधण्यात यावा. ङ्क्त- रमेश पाटील,उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल