शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क १४०० किमीचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:39 IST

मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

- वैभव गायकर

पनवेल: मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आजही अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे या वस्तूंची विक्री करण्यासाठी या कारागिरांना पायपीट करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील पाच  कुटुंबांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू विकण्यासाठी सुमारे १४०० किमीचा प्रवास करून नवी मुंबई गाठली आहे. सध्या खारघरच्या रस्त्यावरच संसार थाटून वेतापासून विविध शोभेच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करणाऱ्या या कुटुंबांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.         दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेले कंदील, फ्लॉवर पॉट, लॅम्प, टोपली , गुलदस्ता , आदी वस्तू दिवस-रात्र मेहनत करून हे कुटुंब बनवीत आहे. महागाई वाढल्याने कच्चा माल कमालीचा महागला आहे. आंध्र प्रदेशापेक्षा नवी मुंबई, मुंबई , ठाणे याठिकाणी अशा प्रकारे शोभेच्या वस्तूंची मागणी जास्त असल्याने आम्ही दरवर्षी याठिकाणी येत असतो, अशी प्रतिक्रिया हस्तकलाकार पी पालम्माय यांनी दिली. आंध्रप्रदेशामधील नेल्लुर जिल्ह्यातील आम्ही रहिवासी असून मूळ गावी आम्ही भूमिहीन असल्यामुळे हस्तकलेच्या व्यवसायावर आम्ही आमची उपजीविका भागवीत असतो. दोन तीन कुटुंबे एकत्र येऊन आम्ही रस्त्यावरच आमचा व्यवसाय थाटत असतो. याच ठिकाणी जेवण, काही क्षण विश्रांती घेऊन आमची दिनचर्या पुढे ढकलत असतो. वेत व फायबर वायरच्या जोडीने या वस्तू तयार केल्या जातात.           २५० रुपयांपासून ते ११०० रुपयांपर्यंत शोभेच्या वस्तू याठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वस्तू टिकावू असल्याने ग्राहक देखील अशाप्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पसंत करतो. मात्र चायना मेडमुळे अनेक ग्राहक या वस्तू खरेदीकडे दुर्लक्ष करतो. सध्या चायनामेडला अनेक ठिकाणी विरोध दर्शविला जातो त्या अनुषंगाने भारतीय बनावटीच्या या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करणे उत्तमच असल्याचे या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहक दीपक शिंदे  यांनी सांगितले. या हस्तकलेच्या लहान वस्तू बनविण्यासाठी सुमारे ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो तर मोठ्या आकाराची वस्तू बनविण्यासाठी कमीत कमी १५ ते १८ तास लागत असल्याचे के. यंकटेश या हस्तकलाकाराने सांगितले. महिला देखील आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी या व्यवसायात काम करतात. चाळीस वर्षीय मुत्यालमाँ यांनी सांगितले की, आम्ही सध्या राहत असलेल्या जागी वीज, पाणी कसलीच व्यवस्था नाही तरी देखील आम्हाला जीवनाचा गाडा हाकावाच लागणार असल्याने एक महिना याठिकाणी थांबल्यानंतर पुढील वर्षभर कमाविलेल्या पैशावर आम्हाला उपजीविका भागवावी लागणार आहे. खारघरमधील सेक्टर १३ जवळील अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर या हस्तकलाकारांनी आपला संसार थाटला आहे. याच ठिकाणी या हस्तकलेने बनविलेल्या वस्तू विक्री देखील केल्या जातात. नवी मुंबईसह, अहमदाबाद, पुणे, मुंबई यासारख्या मेट्रोपोलिटन शहरातील एका कोपऱ्यात आपला व्यवसाय हे हस्तकलाकार थाटत असतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई