शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

एमआयडीसीमध्ये अनियमित पाणीपुरवठा : दिवाळीतच नवी मुंबईकरांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 4:46 AM

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई - स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावरून स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेवून २४ तास पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी परिसराला अद्याप मोरबेचे पाणी पुरविण्यास सुरवात झालेली नाही. तुर्भे ते दिघापर्यंत लाखो नागरिकांना एमआयडीसीच्यावतीने पाणी देण्यात येत आहे. एमआयडीसीने शुक्रवारी शटडाउन घोषित केला असून शनिवार व रविवारी कमी दाबाने पाणी पुरविले जात आहे. माजी महापौर मनीषा भोईर यांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला. श्रमिकनगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत आहेत. अधिकाऱ्यांना याविषयी पाठपुरावा करून काहीच दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देविदास हांडे पाटील यांनीही एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याचे स्पष्ट केले. मोरबे धरणातील पाणी सर्व नवी मुंबई परिसराला मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एमआयडीसीच्या शटडाउनमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली.राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनीही दिघा परिसरातील नागरिकांनाही गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी एमआयडीसी पाणी पुरवत नाही. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी येत असते. आठवड्यातून तीन दिवस पाणीच नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दिघा परिसरामध्ये जलकुंभ उभारण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांना मोरबेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतु अद्याप काम सुरू झाले नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.जलकुंभाची गळती थांबवावाशी सेक्टर २ व ५ मधील जलकुंभाला गळती लागली आहे. या जलकुंभांची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनीही लवकरच या दोन्ही जलकुंभांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाईल असे आश्वासन दिले.पहिल्या आंघोळीला पाणी मिळेल का?नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करत असल्याचा दावा करते, परंतु प्रत्यक्षात एमआयडीसीमधील नागरिकांना गरजेपुरतेही पाणी उपलब्ध होत नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले की, आठवड्यातील एक दिवस अजिबात पाणी मिळत नाही. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळते. किमान दिवाळीत पहिल्या आंघोळीसाठी तरी पाणी उपलब्ध होणार आहे का?एमआयडीसीमधील झोपडपट्टी व इतर सर्व वसाहतींना मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाय करावे. दिवाळीमध्ये व नंतरही शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी.- सुरेश कुलकर्णी,सभापती, स्थायी समितीश्रमिक नगर परिसरामध्ये १५ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाणी मिळत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. आम्ही अधिकाºयांच्या ही गोष्टी निदर्शनास आणून दिली असून लवकरच पाणीप्रश्न सोडविण्यात यावा.- मनीषा भोईर,नगरसेविका, प्रभाग ४८

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका