शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’मध्ये ६५८२ कोटींची गुंतवणूक, टीपीएस-२ मुळे विकासाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 02:20 IST

सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेस (टीपीएस-२) मंजुरी दिल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.

नवी मुंबई  - सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेस (टीपीएस-२) मंजुरी दिल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. दुस-या योजनेमध्ये तब्बल ६५८२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. दोन योजना सुरू झाल्या असून, तिसरी नगररचना विभागाकडे सादर केली असून तिन्ही योजनांमध्ये तब्बल ६४८ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध होणार आहे.मुंबईमधील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईची उभारणी केली; परंतु या परिसरामधील जमीनही संपुष्टात येऊ लागली आहे. यामुळे शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रामध्ये नवीन शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेन व ठाणे तालुक्यामधील २७० गावांच्या परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत. शासनाने ‘नैना’ची घोषणा केली; परंतु या परिसरासाठी नगर रचना परियोजना तयार झाल्या नसल्यामुळे विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. जुलै २०१४ पासून या परिसरामधील बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात झाली; परंतु परवानगी देण्यास खूप विलंब होऊ लागला होता. आतापर्यंत १२५ प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. यापैकी १६ प्रकल्पांना बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी दिली आहे. विकास आराखड्याचे काम सिडकोने सुरू केले होते. २७ एप्रिल २०१७ रोजी अंतरिम विकास आराखड्यास शासनाने परवानगी दिली. ३७ चौरस किलो मीटर क्षेत्रामधील २३ गावांसाठी ही योजना होती.स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगररचना परियोजनांद्वारे शहरांचा विकास साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रणी आहे. मुंबई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या प्रकल्पास गती देण्यासाठी सिडकोने नगररचना परियोजनांद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला व प्रारूप नगर विकास परियोजनांमध्ये बदल करत सिडकोच्या वतीने तीन दशकांनंतर ६४८ हेक्टर क्षेत्रासाठी तीन नगररचना परियोजना तयार करण्यात आल्या. पहिली टीपीएस योजना आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित केली. दुसरी योजनाही कार्यान्वित केली आहे. यामध्ये देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे गावामधील १९४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. भूखंड एकत्रीकरणावर या योजनेचे यश व अपयश अवलंबून असणार आहे. या योजनेमधील लाभधारकांना मूळ भूखंडाच्या ४० टक्के भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार आहे. त्यासाठी अडीच चटईक्षेत्र असणार आहे. उर्वरित ६० टक्के जमिनी पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे. या परिसरामध्ये सार्वजनिक सुविधांसाठी ५८२ कोटींची गुंतवणूक होणार असून खासगी क्षेत्रामधून तब्बल सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूूक केली जाणार आहे.टीपीएस-२ मधील गावेउरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण व ठाणे तालुक्यांमधील २७० गावांचा ‘नैना’मध्ये अंतर्भाव आहे. यामधील २३ गावांचा पहिल्या योजनेमध्ये सहभाग करण्यात आला आहे. सिडकोने टीपीएस दोन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये पनवेलमधील देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे या गावांचा समावेश असणार असून, यामधील १९४ हेक्टर क्षेत्रफळाचा समावेश असणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई