शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

वाहतूककोंडी टाळण्यासाठी उलटा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:20 IST

खारघर टोलनाक्यावरील प्रकार : प्रश्न सोडविण्याकडे टोल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; अपघाताची शक्यता वाढली

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर रोज पहाटे वाहतूककोंडी होत आहे. रखडपट्टी टाळण्यासाठी उलट दिशेने वाहने चालविली जात असून, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या समस्येकडे टोल व्यवस्थापनही दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खारघर टोलनाक्यावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराच्या नियुक्तीचा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला होता. या सर्वांचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. रोज सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान वाहनांची गर्दी असते. मुंबई, नवी मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. ठाणे- बेलापूर एमआयडीसीमधील आयटी सेंटरमधील अनेक तरुण पनवेल परिसरामध्ये राहात आहेत. त्यांना घेऊन जाणारी वाहनेही सकाळीच नवी मुंबईकडे येत असतात. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात मार्गावरून येत असतात. अवजड वाहनांसाठीची लेन ठरलेली असते; पण टोलनाक्यावर सर्वच लेनमधून अवजड वाहने जातात. यामुळे पनवेलच्या दिशेला वाहनांची रांग लागलेली असते. अनेक वेळा अर्धा तास येथे रखडावे लागत असल्यामुळे अनेक कार चालक विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जातात. विरुद्ध दिशेने जाणाºया वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत हा प्रकार थांबविला नाही तर अपघाताची शक्यता आहे.

टोलनाक्यावर रोज सकाळी वाहतूककोंडी होत आहे. वाहनांच्या रांगा वाढल्या की व्यवस्थापनाने काही वाहने टोल न घेता सोडणे आवश्यक आहे. याशिवाय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दुभाजक मोकळे केले असल्यामुळे वाहनांना विरुद्ध दिशेला जाता येते. वास्तविक ज्या ठिकाणावरून वाहने विरुद्ध दिशेला जातात त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करणाºया ठेकेदारानेही योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही वारंवार टोल व्यवस्थापनास याविषयी माहिती दिली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. अनेक वेळा विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर कारवाईही केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही याविषयी सूचना दिल्या आहेत; पण संबंधित विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. टोल वसुलीसाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्यांनाही पोलिसांनी याविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.पहाटेची स्थिती गंभीरपहाटे महामार्गावरून वाहने वेगाने जात असतात. ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाºया मार्गिकेवरून उलट दिशेने शेकडो कार व इतर वाहने नवी मुंबईकडे येत असतात. उलट्या प्रवासामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.टोलसाठी नवीन व्यवस्थापनखारघर टोल वसुलीसाठी दोन दिवसांपासून नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. यामुळे नवीन व्यवस्थापनास अद्याप किती रांगा लागल्यानंतर वाहने टोल न घेता सोडून दिली जावी याविषयीही सूचना नाहीत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.महामार्गावरून उलट्या दिशेने वाहने चालविणे धोकादायक आहे. टोलवर पहाटे होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश टोल व्यवस्थापनास दिले आहेत. त्यांना याविषयी लेखी पत्रही दिले जाणार आहे.- प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक,वाहतूकरोज पहाटे टोलनाक्यावर वाहतूककोंडी होत असल्यामुळे कामावर जाण्यास विलंब होत आहे. विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने चालविली जात असून अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याविषयी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.- सुरेश कारकिले, रहिवासी, पनवेल 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई