शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

उड्डाणपुलाच्या कामांचा वाहतुकीस अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 05:08 IST

सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामांचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे.

- वैभव गायकरपनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामांचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी एक असलेल्या सायन-पनवेल महार्गावरील वाहतूककोंडी ही दैनंदिन समस्या बनली आहे.सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना संपूर्ण महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये उड्डाणपूल वगळण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडत असल्याने अपघात होतात. महामार्गावरील अपघातांची आकडेवारी पाहता, यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उड्डाणपुलाचे काम गेल्या चार महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत. यात वाशी, सानपाडा उड्डाणपूल, जुईनगर - शिरवणे, कोपरा उड्डाणपूल, तळोजा लिंक रोड उड्डाणपूल, कामोठे उड्डाणपूल आदी ठिकाणच्या उड्डाणपुलावर कामे सुरू आहेत. मात्र या सर्व कामाचा फटका महामार्गावरील वाहतुकीवर बसत आहे. वाशीपासून खारघर गाठण्यासाठी यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागे, मात्र उड्डाणपुलांच्या कामांमुळे हेच अंतर गाठण्यासाठी सुमारे ३० मिनिटांचा कालावधी लागत आहे. हे काम सुरू असल्याने दररोज महामार्गावर वाहतुकीत बदल केला जात आहे.महामार्गावर अनेक ठिकाणी बत्ती गुल असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा वाहने घसरणे, अपघातांत वाढ होण्याची शक्यता चालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या उड्डाणपुलावरील कामांची गती पहाता, ती वेळात पूर्ण होतील अशी शक्यता आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित यंत्रणा अधिक गतीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुंबई-गोवा महामार्गावरील खांदा वसाहतीतील उड्डाणपूल सुरूगेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खांदा वसाहतीत जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून रविवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे खांदेश्वर स्थानकातून खांदा वसाहतीत येणाºया वाहनांची कोंडीतून सुटका झाली आहे. मुंबई-गोवा मार्ग हा कायमच वर्दळीचा असतो. सुटी, वीकेण्ड, गणेशोत्सवात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत होती. त्यातच खांदा वसाहतीतून खांदेश्वर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी हा मार्ग ओलांडून जावे लागत असल्याने वाहनचालक तसेच रिक्षाचालकांमध्ये अनेकदा शाब्दिक वादही व्हायचे. मात्र आता उड्डाणपूल सुरू झाल्याने खांदा वसाहतीत होणारी वाहतूककोंडी टळेल, अशी शक्यता चालकांकडून वर्तवण्यात येत आहे.सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्र ीटीकरणाच्या कामांचा कालावधी १८ महिने आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- आर. पी. पाटील,उपअभियंता, सायन-पनवेल महामार्गसायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करताना दररोज मार्गिकेमध्ये बदल केला जात आहे. हे धोकादायक आहे. चालक अनेकदा संभ्रमात पडतात. त्यातच पथदिवे बंद असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पथदिवे सुरू करावेत.- सचिन पवार, वाहन चालक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई