शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 01:49 IST

बंद घरांवर लक्ष : वाहनचोरीचे सत्रही सुरू; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

नवी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे हजारो नागरिक मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जाऊ लागले आहेत. याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. घरफोडी व वाहनचोरीच्या घटना वाढू लागल्या असून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरणमधील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. लग्न, गावाकडील यात्रा, निवडणूक व इतर कारणांमुळे हजारो चाकरमानी गावी गेले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठीही अनेक जण बाहेर जात आहेत. प्रत्येक वर्षी याच कालावधीमध्ये चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. चोरट्यांनी बंद घरांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. गत आठवड्यामध्ये नेरुळ गावामध्ये एकाच इमारतीमधील पाच घरांचे टाळे तोडून दागिने व रोख रकमेची चोरी करण्यात आली होती. अशाप्रकारच्या अनेक घटना शहरात घडू लागल्या आहेत. ज्या घराचा दरवाजा दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बंद आहे, अशा घरांचे टाळे तोडून आतमधील किमती साहित्य चोरून नेले जात आहे. रोडवर उभ्या केलेल्या वाहनांचीही चोरी केली जात आहे. जी वाहने दोन दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी उभी आहेत ती चोरी करू लागली आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाताना नागरिकही पुरेशी काळजी घेत नाहीत. सुरक्षारक्षक असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बंद घरांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. गावी जाताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणेही आवश्यक आहे. वाहने शक्यतो रोडवर उभी करू नयेत. वाहनतळावर सुरक्षितपणे वाहने उभी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पण नागरिक सुरक्षेविषयी उदासीनता दाखवत असल्यामुळे चोरट्यांना संधी मिळत आहे. अनेक नागरिकांच्या घरांची कडी, कोयंडी चांगल्या दर्जाचे नसतात. दोन मिनिटात चोरटे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत आहेत. रोडवर उभ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षेची उपकरणे वापरली जात नाहीत. यामुळे वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांनी उन्हाळ्यासाठी शहरामधील गस्त वाढविली आहे.

नागरिकांकडून सुट्ट्यांमध्ये घर बंद करून बाहेर जाताना घरातील ऐवज सेफ्टी लॉकरमध्ये अथवा बँकेत ठेवला जाणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता अनेक जण महागडे दागिने घरात ठेवून सुट्टीवर जातात. अशावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या गुन्हेगाराकडून घरफोडीची शक्यता असते.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुरक्षेची अनेक उपकरणे बाजारात आहेत. त्यामध्ये सीसीटीव्हीसह सेन्सर अलार्मचाही समावेश आहे. त्याद्वारे घर बंद असताना आतमध्ये कसलीही संशयास्पद हालचाल झाल्यास अलार्म वाजून मोबाइलवर देखील त्याची माहिती मिळू शकते.मागील काही दिवसात पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात घरफोडी व चोरी करणाºया गुन्हेगारांचाही समावेश आहे. मात्र गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरीही नागरिकांकडून देखील स्वत:च्या ऐवजाची काळजी घेतली जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सुट्ट्यांमध्ये घराबाहेर जाताना नागरिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. घराला सेफ्टी डोअर तसेच सीसीटीव्ही असल्यास चोरीला आळा बसू शकतो. तसेच इमारतीच्या सुरक्षारक्षकाने अज्ञात व्यक्ती, सेल्समन यांना आतमध्ये प्रवेश देणे टाळले पाहिजे. - डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपआयुक्त

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईtheftचोरीPoliceपोलिस