शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 07:12 IST

गृहमंत्रिपदाचा भार हलका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली.

नवी मुंबई : हसत खेळत राहिल्याने तणाव कमी होतो. या कार्यक्रमात आल्यानंतर तर मी खऱ्या अर्थाने तणावमुक्त झालो आहे, असे प्रतिपादान राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. गृहमंत्रिपदाचा भार हलका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तणावमुक्त राहण्यासाठी माणसाने नेहमी हसत राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राच्या वतीने नेरूळ येथे पुण्यातील योग तज्ज्ञ अशोक देशमुख यांच्या हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वळसे पाटील, त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी यावेळी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील दोन तासांच्या व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

हा कार्यक्रम पाहून मी सतत हसत होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज तणावमुक्त झाल्याचे दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी  नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, बृहन्मुंबई नागरी सह बँक असोसिएशन अध्यक्ष काशिनाथ मोरे, ऐरोली ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बबन पाटणकर यांना प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. अशोक पाटील यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस