शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 3:09 AM

कारवाईकडे दुर्लक्ष : अपघातांचा धोका

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : जलद वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावर बेकायदा वाहने उभी केली जातात. मार्गावर जागोजागी खासगी कंपन्यांची वाहने मोठ्या संख्येने उभी केली जात असल्याने इतर वाहनांच्या रहदारीत अडथळा निर्माण होतो. तसेच अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. तसेच वाहतूक अधिक जलद गतीची व्हावी, याकरिता जागोजागी पूलही उभारण्यात आले आहेत. यामुळे ठाणे व नवी मुंबईमधील प्रवासाचे अंतर पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. परिणामी, मार्गावरील रोजच्या रहदारीतही कमालीची वाढ झाली आहे. परंतु या मार्गावर जागोजागी होणारी अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहने अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.

ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे तसेच इतर अनेक ठिकाणी सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी केली जातात. या मार्गाच्या एका बाजूस औद्योगिक पट्टा असल्याने येथील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बसचा सर्वाधिक समावेश आहे. मुंबई, ठाणे परिसरातून कर्मचाऱ्यांना कंपनीत आणून सोडल्यापासून ते संध्याकाळी कर्मचाºयांना पुन्हा नियोजित ठिकाणी सोडून आल्यानंतर रात्रंदिवस या बस ठाणे-बेलापूर मार्गावरच उभ्या केलेल्या असतात. यामुळे रस्त्याची एक लेन अवैध वाहनांची व्यापली आहे. परिणामी, तुर्भेसह ऐरोली व इतर ठिकाणी रहदारीत अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा दोन लेनमध्येही बस उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीचा फटका रुग्णवाहिकेलाही बसतो.सर्व्हिस रोडही बळकावलाच्मार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून खासगी कंपन्यांकडून याठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. औद्योगिक पट्ट्यातील बहुतांश कंपन्यांच्या बस ठाणे-बेलापूर मार्गासह सर्व्हिस रोडवर उभ्या असतात. तर काही ठिकाणी पुलाखालची मोकळी जागाही बळकावण्यात आलेली आहे. अवैध पार्किंगवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांसह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई