शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका, ग्राहकांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 3:45 AM

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत

नवी मुंबई : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी जमण्याच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच खबरदारीचा उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनीही स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे नेहमीची वर्दळीची असणारी ठिकाणेही ओस पडली आहेत.राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत; परंतु त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामध्ये उद्याने, हॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहे यांचा समावेश आहे. त्याशिवाय सार्वजनिक सभा व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा वावर झाल्यास अनेकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, तर त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे हॉटेल व बारही ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवले जावेत, अशी मागणी होत आहे; परंतु प्रशासनाने जरी त्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नसला, तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी मात्र स्वेच्छेने व्यवसाय बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना रोजचा १० ते ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर जे हॉटेल अद्यापही सुरू ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी नागरिकच जायचे टाळत आहेत, यामुळे नेहमी ग्राहकांची वर्दळ असणारी हॉटेल मागील दोन दिवसांपासून ओस पडली आहेत; परंतु हॉटेल व बार यामध्ये जमणाऱ्या गर्दीच्या बाबतीत प्रशासनाने अद्याप गांभीर्य घेतले नसल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. परिणामी, शहरातील सर्व्हिसबार व बेकायदेशीरपणो चालणारे डान्सबार अद्यापही रात्री उशिरापर्यंत चालवले जात आहेत.हॉटेलचालक संघटनेच्या निर्णयाकडे लक्षहॉटेलमध्ये ग्राहकांच्या स्वरूपात जमणारी गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. यानंतरही इतर आस्थापने व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणाºया प्रशासनांना हॉटेल व बारचा विसर पडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने हॉटेल्स बंद ठेवली आहेत. हॉटेलचालक संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुरक्षेसाठी हॉटेल बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे रोजचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे; परंतु स्वत:च्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर हॉटेल व्यावसायिकांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे आहे.- संदीप पाटील, हॉटेल व्यावसायिक, कोपरखैरणे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhotelहॉटेल