शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये बळावतोय उच्च रक्तदाब

By admin | Updated: June 22, 2017 00:14 IST

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एकत्र आले, असे आपण म्हणतो; परंतु या एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांचे गुण-दोष नकळत अंगीकारत असतो.

प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एकत्र आले, असे आपण म्हणतो; परंतु या एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांचे गुण-दोष नकळत अंगीकारत असतो. या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक जीवघेणे आजार भारतामध्ये वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मोठे घर व गाडी, वर्षातून दोन ते चार वेळा कुटुंबीयांसोबत परदेशी सहली, अशी जीवनशैली प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. मात्र, या हव्यासापोटी तरुणांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. कामाचे तास वाढविणे, बैठी जीवनशैली, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे अथवा कामाच्या व्यापात जेवणाला दांडी मारणे, असे प्रकार आजूबाजूला पाहायला मिळतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरु वात होते.संगणकासमोर तासन्तास बसून काम करत राहिल्याने तरुणांची शरीराची हालचाल मंदावलेली असते, तसेच व्यायामाच्या अभावाने शरीरातील मेद वाढतो. तरुणांमध्ये दारू व तंबाखू याचे व्यसन मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये जर उच्च रक्तदाबाची लागण झाली हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणामाचा संभव असतो. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत ३० टक्क्यांहून अधिक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित असून, यातील ५० टक्के लोकांना पहिली ५ ते ८ वर्षे याची कल्पनाही नसते. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाचा विकार वाढतो आहे. नोकरी मिळविण्यापासून ते टिकविण्यासाठी स्पर्धा वाढली असल्यामुळे, वयाच्या पंचविशीमध्ये उच्च रक्तदाबाला आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्र कमी होऊन, सेवाक्षेत्रातील नोकऱ्या वाढल्या आहेत. त्यातही आयटी, बीपीओसारख्या नोकऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. कॅन्टीन फूड, सेवा क्षेत्रातील सततच बैठे काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणे, पॅनिक होणे, ताणतणाव वाढणे, असे विकार वाढीस लागले आहेत. गेल्या १० वर्षांत उच्च रक्तदाबाच्या वयाचा आलेख हा खाली येत असून, वयाच्या तिशीतल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती डॉ. बेहराम परडीवाला यांनी दिली. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर चांगला आहार, विहार, विचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामधील चांगल्या-वाईट घटकांच्या परिणामामुळे अनेकांना नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हृदयविकार, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, पक्षाघाताचा झटका येणे, असे धोके यामुळे संभवतात. घर आणि आॅफिस अशा दुहेरी भूमिका बजाविणाऱ्या महिलांमध्येही रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.