शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

सव्वा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी; एपीएमसीत १ लाख १५ हजार मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 1:27 AM

पाच लाख नागरिकांचे तापमान तपासले

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचही मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. दोन महिन्यांमध्ये तब्बल १ लाख २७ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. आतापर्यंत १ लाख १५ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले असून ४ लाख ९९ हजार जणांचे तापमान तपासले असून अशा प्रकारे यंत्रणा राबविणारी नवी मुुंबई देशातील एकमेव बाजार समिती ठरली आहे.

मुंबईसह नवी मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी बाजार समितीवर आहे. २० मार्चपासून अनेक संकटांना सामोरे जाऊन प्रशासनाने मुंबईकरांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यात यश मिळविले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान सलग सात दिवस पाचही मार्केट बंद ठेवावी लागली होती. पुन्हा अशी स्थिती येऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने सुरक्षेसाठीच्या उपाययोजना कडक करण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपासून प्रत्येक मार्केटनिहाय वेगवेगळी उपाययोजना केली आहे. गर्दी कमी करण्यासाठीही आवक नियंत्रित ठेवली आहे.

ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क परिधान केल्याशिवाय मार्केटमध्ये प्रवेशच दिला जात नाही. रांग लावण्यासाठी बॅरिकेड तयार केले आहेत. आतमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. आवक गेटवर वैद्यकीय पथक तैनात केले आहे. प्रत्येकाला हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. मास्क नसेल तर एपीएमसीच्या वतीने मोफत मास्क उपलब्ध करून दिला जात आहे. थर्मल गनद्वारे तापमान मोजण्यात येत आहे. प्रत्येकाचे पल्स आॅक्सिमीटरद्वारे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.

एपीएमसीमध्ये येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्यामुळे जर कोणाची प्रकृती ठीक नसेल तर तत्काळ लक्षात येऊ लागले आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर तत्काळ त्याचा स्वॅब घेऊन तपासणी केली जात आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्रत्येकाला वैद्यकीय तपासणी प्रवेशपत्र दिले जात आहे. मार्केटमध्ये सुरक्षारक्षक व बाजार समितीचे कर्मचारी खरेदीदार व इतरांकडे प्रवेशपत्र आहे का, याचीही तपासणी करत आहेत. जर कोणाकडे पत्र मिळाले नाही तर त्यांच्यावर एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.

देशातील एकमेव बाजार समिती

मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव बाजार समिती आहे. बाजार समिती व्यतिरिक्तही इतर कोणत्याच संस्थेमध्ये प्रत्येकाची नियमित आरोग्य तपासणी केली जात नाही. मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा, वाहनांचे निर्जंतुकीकरण, मार्केटचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रत्येकाचे तापमान व आॅक्सिजन तपासले जात असून अशा प्रकारे उपाययोजना राबविणारी मुंबई बाजार समिती एकमेव संस्था ठरली आहे.

मुंबई, नवी मुंबई व उपनगरांमधील नागरिकांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे. मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पणन विभागाचे प्रधान सचिव, पणन संचालक व शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.- अनिल चव्हाण, सचिव,

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना योद्धा पुन्हा कर्तव्यावर बाजार समितीमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीलाही लागण झाली होती. बाजार समिती प्रशासनाने या दोघांच्याही उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी तळेकर पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामुळे बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी स्वत: फळ मार्केटमध्ये जाऊन तळेकर यांचे स्वागत केले.

२० मार्चपासून उपलब्ध साहित्य   साहित्य संख्याफेस मास्क १ लाख १५,८४०हॅन्ड सॅनिटायझर २०६२फेस स्प्रे ९७तापमान तपसणी ५ लाख १५ हजारहॅन्ड ग्लोव्हज ४६४९फेस शिल्ड १५०पीपीई किट्स २२

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस