जमीन व्यवहारांत घोळ
By Admin | Updated: September 16, 2014 22:40 IST2014-09-16T22:40:26+5:302014-09-16T22:40:26+5:30
फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत.

जमीन व्यवहारांत घोळ
जयंत धुळप ल्ल अलिबाग
शासकीय सेवेत लोकसेवक या नात्याने काम करीत असताना आपल्याला प्राप्त अधिकारांचा गैरवापर करुन बेकायदा कृती केल्या प्रकरणी जिल्हय़ातील विविध पोलीस ठाण्यात रीतसर फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत.
या 21 मध्ये प्रथम वर्ग अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्य़ात सापडलेले कजर्तचे तत्कालीन तहसीलदार युवराज बांगर, द्वितीय वर्ग अधिकारी कजर्तचे नायब तहसीलदार रवींद्र कुंटे, अन्य एक द्वितीय वर्ग अधिकारी यांच्यासह महसूल विभागातील 18 तलाठी व महसूल मंडळ अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अजित नैराळे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
मुंबईतील भांडुप येथील भिकाजी धाकू राजम यांनी कजर्त तालुक्यातील निकोप गावातील हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे यांच्याकडून 2 फेब्रुवारी 1989 रोजी खरेदी दस्त क्र.412/1989 अन्वये जमीन खरेदी केली होती. परंतु त्यावेळी सातबारा उता:यावर भिकाजी धाकू राजम यांचे नाव नोंदविण्याचे राहून गेले होते.
याच त्रुटीचा नेमका गैरफायदा घेवून हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे व दशरथ चंद्रकांत भगत (रा.चिंचवली-कजर्त) यांनी संगनमत करुन मुंबईतीलच माहिम येथील उषा अशोक जोहरी व अशोक जोहरी यांच्याशी खोटे खरेदीखत करुन विक्री केली.
या प्रकरणी मूळ मालक भिकाजी धाकू राजम यांनी कजर्त न्यायालयात दावा दाखल केल्यावर सुनावणी अंती न्यायालयाने कजर्त पोलिसांना दिलेल्या आदेशान्वये हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे, दशरथ चंद्रकांत भगत (रा.चिंचवली-कजर्त), उषा अशोक जोहरी व अशोक जोहरी यांच्यासह कजर्तचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे.
महसूल तलाठय़ासह
पाच जणांवर गुन्हा
4खोटय़ा अखत्यारपत्रद्वारे मूळ जमीन मालक 1क् असताना त्यातील पाच जणांना वगळून माणगांवमधील ही जमीन पाच जणांच्या नावे करुन खोटा सातबारा आणि खोटे सरकारी फेरफार करुन फसवणूक केल्या प्रकरणी खालापूर तालुक्यातील हाळबुद्रुक गावातील शफिक अहमद जळगांवकर यांची फसवणूक केल्या प्रकरणी माणगाव तालुक्यातील पहेल गावचा तलाठी आर.व्ही.महाले यांच्यासह संदेश रामचंद्र नागे (रा.साजगांव-खालापूर), दिलीप खाशाबा भोसले, रघुनाथ येटू उभारे व हरिदास रामचंद्र उभारे (सर्व रा.माणगांव) यांच्या विरुद्ध गोरेगांव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
असा होतो बेकायदा जमीन विक्री व्यवहार
4नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जिल्हय़ाबाहेर असणा:या जिल्हय़ातील शेतकरी व ग्रामस्थ यांना हेरुन त्यांच्या शेतजमिनी महसूल यंत्रणोतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संधान साधून, बनावट मालक, त्या बनावट जमीन मालकाचे बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे आहेत असे भासवून, जमिनींची परस्पर बेकायदा विक्री केली जाते. त्यातून मूळ शेतजमीन मालक आणि जमीन खरेदीदार या दोघांचीही फसवणूक होते. असे हे बेकायदा उद्योग गेल्या दोन-चार वर्षात जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात फोफावले आहेत.
असा दाखल होतो पोलिसांत गुन्हा
4फसवणूक होवून आपली शेतजमीन बेकायदा विक्री झाल्याप्रकरणी मूळ मालक तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करतात. परंतु या प्रकरणांचा महिनोंमहिने निर्णय होत नाही. या तक्रारी पोलीस ठाण्यात देखील दाखल करुन घेतल्या जात नाही. अखेर पीडित शेतकरी व ग्रामस्थ न्यायालयात दिवाणी दावा दाखल करतात.
वस्तुस्थिती समोर आल्यावर अखेर फौजदारी गुन्हे
4न्यायालयांत या प्रकरणांची सुनावणी होवून, त्यातली वस्तुस्थिती समोर आल्यावर अखेर न्यायालयच या फसवणुकींच्या प्रकरणांत पोलिसांना रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे आादेश देते. आणि महसूल यंत्रणोतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह बनावट जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणा:यांवर देखील गुन्हा दाखल होतो.