शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
२६ पर्यटकांच्या हत्येचा बदला! सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी, ऑपरेशन महादेवला मिळालं यश
3
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
5
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
6
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
7
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
8
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
10
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
11
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
12
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
13
'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन 
14
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
15
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
16
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
17
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
18
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
19
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
20
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

‘राष्ट्रीय बाजारा’च्या निर्णयावर फेरले पाणी; महाविकास आघाडीची महायुतीवर कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 05:57 IST

मुंबई बाजार समितीचा याबाबतचा मसुदा तर तयार करून राज्यपालांकडे पाठविलेला आहे. अशातच उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचे समज आहे. 

नारायण जाधवनवी मुंबई : राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती  संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या निर्णयामुळे एकीकडे मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती घोषित करण्याच्या सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे, तर दुसरीकडे पणन विभागाने या बाजार समितीची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या विरोधात विद्यमान संचालकांनीच न्यायालयात धाव घेऊन निवडणुका तत्काळ घेण्याचा निर्णय आणून महायुतीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे. कारण विद्यमान संचालकात सर्वाधिक काँग्रेससह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मानणारे आहेत. मुंबई बाजार समिती ही येथील दररोजच्या कोट्यवधींच्या उलाढालीमुळे राज्यकर्त्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी काेंबडी समजली  जात असून येथे संचालक होण्यासाठी आमदार, खासदारांतही चढाओढ असते. 

या बाजार समितीवर आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. राज्यात सत्ताबदल होताच महायुतीने ती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच प्रशासकाची  नियुक्ती करण्यात आली हाेती. राज्य शासनाने राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई बाजार समितीचा याबाबतचा मसुदा तर तयार करून राज्यपालांकडे पाठविलेला आहे. अशातच उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचे समज आहे. 

स्वत:ची केलेली नियुक्ती पडली महागात मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त करून प्रशासक म्हणून पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे रसाळ हेच राज्याचे पणन संचालक असून त्यांनीच स्वत:च्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्तीचे आदेश काढले होते. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र टीका केली होती. सरकार ठाम राहिले होते. या निर्णयाविराेधात तत्कालीन महाविकास आघाडीचे समर्थक असलेल्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात राज्य शासनाची बाजू पुरेशा ताकदीने मांडली गेली नाही, असे सांगण्यात येते. त्यातच रसाळ यांनी स्वत:च स्वत:ची केलेली नियुक्ती  महागात पडल्याची चर्चा आहे. एकूण या निर्णयानंतर बाजार समितीमध्ये चर्चेला उधाण आले असून, सर्वांचे लक्ष आता निवडणुकीकडे लागले आहे.

न्यायालयाने संचालक मंडळास अभय देऊन निवडणूक तत्काळ घेण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केल्याने संचालक मंडळ असूनही अर्थ नाही. त्यामुुळे शासनाने संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्यावी. मात्र, राज्य शासनाचा राष्ट्रीय बाजाराचाच आग्रह आहे. त्यासाठीचा अध्यादेश काढला तर यातसुद्धा व्यापारी प्रतिनिधींना इलेक्टेड पद्धतीने घ्यावे. - संजय पानसरे, संचालक, फळमार्केट

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHigh Courtउच्च न्यायालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती