शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

पावणे येथे २०० झाडे तोडण्याचा घाट, पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By नारायण जाधव | Updated: March 28, 2024 16:30 IST

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल २०० झाडे तोडण्याचा घाट रचण्यात आला आहे. ...

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल २०० झाडे तोडण्याचा घाट रचण्यात आला आहे. ही झाडे ज्या भूखंडावर आहेत ती जागा प्रकल्पग्रस्त (पीएपी) यांच्यासाठी भूखंडवाटपासाठी देण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.सरकारने प्रकल्पस्तांना भूखंडवाटप करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, त्यासाठी हिरवळ नष्ट करणे धक्कादायक आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ओएस – ७ (ओपन स्पेस दर्शविणारी) वरील झाडे वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करणारा ई-मेल मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता आणि अत्यंत ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थाचा व्यवहार करणाऱ्या शेजारच्या खासगी कंपनीने २० वर्षांपूर्वी ते हरित क्षेत्र म्हणून विकसित केले. एमआयडीसीने ही जागा हरित क्षेत्र राखण्यासाठी सहमती दर्शवून ती भाडेतत्त्वावर दिली होती. नॅटकनेक्टने मिळवलेली कागदपत्रांवरून दिसत आहे.कंपनीने जी २०० झाडे लावली आहेत ज्यात अनेक पूर्ण वाढलेली खजूर आणि फुलझाडे आहेत. या जागेवर आता प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अत्यंत प्रदूषित रासायनिक युनिट्सचे वर्चस्व असलेल्या संपूर्ण पावणे भागात हे एकमेव हिरवे फुफ्फुस असून ते वाचवले पाहिजे. कारण शहरी भागातील झाडे हवा फिल्टर करून हानिकारक कण काढून टाकतात, असे नॅटकनेक्टने म्हटले आहे.वृक्षगणना करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने ओएस-७ येथे झाडांची नोंद घेतली असून ही हिरवळ वाचवण्याची जबाबदारी ही त्यांचीसुद्धा आहे................वास्तविक नवी मुंबई या तथाकथित नियोजित शहरात दरडोई खुली जागा अत्यंत कमी आहे, असे नॅटकनेक्टने निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारच्या AMRUT (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) अंतर्गत सुमारे १०,००० चौरस मीटर प्रति हजार लोकसंख्येच्या अटींविरुद्ध, महापालिका अवघ्या खुल्या ३००० चौरस मीटर जागेवर काम करते.नवी मुंबईत आता केवळ ५ टक्के जमीन विकसित व्हायची असून २०३८ पर्यंत लोकसंख्या ३,७७,००० ने वाढण्याचा अंदाज असल्याने नवी मुंबई महापालिकेने मोकळ्या जागा आणि हिरव्यागार फुफ्फुसांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे कुमार म्हणाले.एमआयडीसी आणि सिडकोने पीएपींच्या पुनर्वसनासाठी योग्य योजना तयार करावी. औद्योगिक पट्टा आणि त्यानंतर नियोजित शहराची निर्मिती होऊन आता सहा दशके उलटूनही पीएपीचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू असल्याने ही धक्कादायक बाब आहे, अशी खंत पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :environmentपर्यावरणState Governmentराज्य सरकार