शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By नारायण जाधव | Updated: October 23, 2023 12:21 IST

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे.

नवी मुंबई : घणसोलीतील ३७ दशलक्ष लीटर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित केले जात असल्याची पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  तक्रार केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. विषारी पाणी खाडीत शिरल्यामुळे, त्याचा जैवविविधता आणि समुद्री जीवनावर घातक परिणाम होत असल्याचा आरोप नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत  केला आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी एसटीपी वारंवार बंद पडण्याची तसेच महानगरपालिका प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केल्याचे कुमार म्हणाले. 

कुमार यांनी ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेली आहे. एसटीपी प्रकल्प असलेल्या जमीनीवर कान्हा पाटील यांनी मालकीचा दावा केल्यामुळे प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सदर भूखंड घणसोली नवी मुंबई येथील सेक्टर १५ मध्ये येतो. या भागात मोठा  विकास झालेला आहे. सिडकोने आपल्याला कोणतीही भरपाई दिलेली नाही असा दावा कान्हा पाटील यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी प्रकल्प बंद पाडला आहे.

कुमार यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या वादाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.

नवी मुंबईमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या कुमार यांनी घणसोली आता महत्वपूर्ण रियल्टी स्थानांपैकी एक बनत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये सिडकोने मागविलेल्या निविदेस घणसोलीच्या भूखंडाची किंमत प्रति चौ.मीटर ३ लाखांहून देखील जास्त होती.

महाकाय व्यावसायिक आणि रहिवासी कॉंप्लेक्सचे या भाग निर्माण करताना सिडकोने एसटीपी समस्येची साधी दखल देखील घेतली नाही, ही बाब अतिशय धक्कादायक आहे असे कुमार म्हणाले. 

टॅग्स :pollutionप्रदूषणthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई