शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By नारायण जाधव | Updated: October 23, 2023 12:21 IST

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे.

नवी मुंबई : घणसोलीतील ३७ दशलक्ष लीटर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित केले जात असल्याची पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  तक्रार केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. विषारी पाणी खाडीत शिरल्यामुळे, त्याचा जैवविविधता आणि समुद्री जीवनावर घातक परिणाम होत असल्याचा आरोप नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत  केला आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी एसटीपी वारंवार बंद पडण्याची तसेच महानगरपालिका प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केल्याचे कुमार म्हणाले. 

कुमार यांनी ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेली आहे. एसटीपी प्रकल्प असलेल्या जमीनीवर कान्हा पाटील यांनी मालकीचा दावा केल्यामुळे प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सदर भूखंड घणसोली नवी मुंबई येथील सेक्टर १५ मध्ये येतो. या भागात मोठा  विकास झालेला आहे. सिडकोने आपल्याला कोणतीही भरपाई दिलेली नाही असा दावा कान्हा पाटील यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी प्रकल्प बंद पाडला आहे.

कुमार यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या वादाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.

नवी मुंबईमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या कुमार यांनी घणसोली आता महत्वपूर्ण रियल्टी स्थानांपैकी एक बनत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये सिडकोने मागविलेल्या निविदेस घणसोलीच्या भूखंडाची किंमत प्रति चौ.मीटर ३ लाखांहून देखील जास्त होती.

महाकाय व्यावसायिक आणि रहिवासी कॉंप्लेक्सचे या भाग निर्माण करताना सिडकोने एसटीपी समस्येची साधी दखल देखील घेतली नाही, ही बाब अतिशय धक्कादायक आहे असे कुमार म्हणाले. 

टॅग्स :pollutionप्रदूषणthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई