शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By नारायण जाधव | Updated: October 23, 2023 12:21 IST

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे.

नवी मुंबई : घणसोलीतील ३७ दशलक्ष लीटर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित केले जात असल्याची पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  तक्रार केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. विषारी पाणी खाडीत शिरल्यामुळे, त्याचा जैवविविधता आणि समुद्री जीवनावर घातक परिणाम होत असल्याचा आरोप नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत  केला आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी एसटीपी वारंवार बंद पडण्याची तसेच महानगरपालिका प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केल्याचे कुमार म्हणाले. 

कुमार यांनी ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेली आहे. एसटीपी प्रकल्प असलेल्या जमीनीवर कान्हा पाटील यांनी मालकीचा दावा केल्यामुळे प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सदर भूखंड घणसोली नवी मुंबई येथील सेक्टर १५ मध्ये येतो. या भागात मोठा  विकास झालेला आहे. सिडकोने आपल्याला कोणतीही भरपाई दिलेली नाही असा दावा कान्हा पाटील यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी प्रकल्प बंद पाडला आहे.

कुमार यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या वादाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.

नवी मुंबईमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या कुमार यांनी घणसोली आता महत्वपूर्ण रियल्टी स्थानांपैकी एक बनत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये सिडकोने मागविलेल्या निविदेस घणसोलीच्या भूखंडाची किंमत प्रति चौ.मीटर ३ लाखांहून देखील जास्त होती.

महाकाय व्यावसायिक आणि रहिवासी कॉंप्लेक्सचे या भाग निर्माण करताना सिडकोने एसटीपी समस्येची साधी दखल देखील घेतली नाही, ही बाब अतिशय धक्कादायक आहे असे कुमार म्हणाले. 

टॅग्स :pollutionप्रदूषणthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई