शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पावसामुळे फळांचे दर घसरले; भाजीपालाही राहिला शिल्लक, एपीएमसीत ग्राहकांनी फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:06 IST

बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली.

नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबईमध्येही सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावरही झाला आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळांच्या दरामध्ये घसरण झाली आहे आणि मागणीअभावी भाजीपालाही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.

बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली आहे. हापूस आंब्याचे दर ५०० ते ६०० रुपये डझनवरून ३००  रुपयांवर आले. कर्नाटक हापूस व इतर आंब्याचे दरही प्रतिकिलो ९० ते २०० रुपयांवरून ८० ते १८० रुपयांवर आले आहेत. जांभळाचे प्रतिकिलो दर देखील ३५० ते ४५० रुपयांवरून २५० ते ३५० रुपये किलो झाले आहेत. गत आठवड्यात २०० ते ३०० रुपये  किलो दराने विकली जाणारी लिची १५० ते २०० रुपये किलोपर्यंत घसरली आहे.

सर्व मार्केट जलमय

बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. सोमवारी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर २ फूट पाणी साचले होते. कांदा, बटाटा, मसाला व धान्य मार्केटमध्येही काही ठिकाणी पाणी साचले होते.  

कोथिंबीरसह, टोमॅटोचे नुकसान

भाजीपाला मार्केटमध्ये २ हजार टन आवक झाली आहे; परंतु ग्राहक नसल्यामुळे जवळपास ५०० टन माल शिल्लक राहिला आहे. कोथिंबिरीसह टोमॅटोचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये फारसा फरक पडला नसून, गत आठवड्यात दर स्थिर आहेत.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीRainपाऊस