शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:23 IST

इतर ५० बस सुदैवाने सुरक्षित, इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: NMMT च्या घणसोली येथील आगारातआग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामध्ये चार बस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. इतर तीन ते चार बसचे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली आहे.

घणसोली आगारात एनएमएमटीच्या वापरात नसलेल्या सुमारे ५० बस उभ्या केल्या आहेत. त्याच ठिकाणी इलेक्ट्रिक बसदेखील उभी करण्यात आली होती. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बस बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत. या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरींमध्ये बिघाड होत असल्याचे समजते. अशातच घणसोली आगारात दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिक बसला बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आग लागली. 

काही वेळातच पूर्ण बसने पेट घेतल्याने बाजूलाच असलेल्या तीन डिझेल बस जळाल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघाले होते. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे व ऐरोली अग्निशमन दलाने तेथे धाव घेतली. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने  ५० बस वाचल्या.

‘पत्रकारांना आत सोडू नका’ 

आगारात लागलेल्या आगीची माहिती कळताच पत्रकार, छायचित्रकारांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र कोणत्याही पत्रकाराला आत सोडायचे नाही, असे अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगत माध्यमांना आत प्रवेश नाकारला. त्यावरून डेपोत नेमके काय गौडबंगाल चालले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

प्रशासन म्हणते, म्हणून आग गतीने पसरली

डेपोत आग लागलेल्या बसची नियमित दुरुस्ती करण्याची व सुट्या भागांसह जबाबदारी मूळ उत्पादक व पुरवठादार मे एम. एच इको लाइफ तथा जेबीएम यांची होती. इंजिन बिघाडामुळे एखाद्या बसच्या बॅटरी पॅकमध्ये (०४ बॅटरी पॅक) शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याचे एनएमएमटी प्रशासनाने कळवले. 

कर्मचाऱ्यांनी त्वरित याबाबत उपलब्ध फायर एक्स्टिंग्वीशरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ४ बॅटरी पॅक असल्याने व ते सील असल्याने आग गतीने पसरली. यामुळे अपघातग्रस्त बससह बंद ३ डिझेल बस (मे. महालक्ष्मी बस ट्रान्सपोर्ट प्रा.लि. यांच्या कंत्राटमधील) यांनाही आग लागल्याने त्यांचेही नुकसान झाले, असे एनएमएमटी प्रशासनाने म्हटले.

आगारात रिक्षा पार्किंग?

आगारात बस व अधिकाऱ्यांची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश नसतानाही सर्व्हिस सेंटरला लागूनच रिक्षा उभ्या असल्याचे दिसून आले. त्यावरून आगारात रिक्षा पार्किंग होते? की इतर कोणत्या कामासाठी रिक्षांचा वापर होतोय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई