शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

बेलापूर येथील किल्ल्याची दुरवस्था; सिडकोची उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 23:02 IST

टेहळणी बुरु जाची पडझड, इतिहासप्रेमींकडून नाराजी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याची आणि बुरुजाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिलेला किल्ला परिसरात झालेल्या विकासकामांमुळे धोकादायक स्थितीमध्ये उभा आहे. सिडकोच्या उदासीनतेमुळे किल्ल्याबरोबर टेहळणी बुरुजाचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, किल्ल्याचे उरलेले मोजके अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.पनवेल आणि ठाण्याच्या खाडीचा संगम होणाऱ्या ठिकाणी बेलापूर गाव वसलेले आहे. आगरी, कोळी समाजाची वस्ती असलेल्या या गावात पोर्तुगिजांनी बेलापूर किल्ला बांधला होता. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलीकडील मराठ्यांकडून होणाºया संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी सदर किल्ला बांधला होता. खाडीकिनारी असलेल्या भागात भराव टाकण्यात आल्याने तसेच किल्ल्याची देखभाल आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष केल्याने पडझड झाली आहे, त्यामुळे किल्ल्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असून, किल्ल्याच्या एकमेव शिल्लक असलेल्या बुरु जाचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शहर वसविणाºया सिडकोला या किल्ल्याची डागडुजी करण्याकडे विसर पडला आहे. २०१५ साली सिडकोमार्फत भरविण्यात आले होते, या वेळी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी ११ कोटी रु पयांची भरघोस तरतूद केली होती, यामध्ये २०१७ सालापर्यंत सुशोभीकरण पूर्ण करण्यात येणार होते; परंतु सिडकोच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अद्याप सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट झाली आहेत. फक्त एक टेहळणी बुरूज अर्धवट मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बुरुजाला एका बाजूला भेग पडली आहे आणि दुसºया बाजूचे बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याने या ठिकाणी जाणाºया नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ल्याबरोबर या बुरुजाचेही रक्षण करण्याची आवश्यकता आहे. सिडकोने काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा फेरनिविदा काढली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.बेलापूर किल्ल्याला पाच बुरूज व तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३५ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.

टॅग्स :FortगडNavi Mumbaiनवी मुंबई