शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

खारफुटीमुळे सीबीडीला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:18 IST

या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : गेली अनेक वर्षे सफाई न झाल्याने सीबीडीतील होल्डिंग पाँडमध्ये खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. त्यात होल्डिंग पाँड भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गेल्या काही वर्षांपासून सीबीडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत. या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना, मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी काय करता येईल, याचा सिडकोने सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर, नवी मुंबई शहरात सुमारे ११ ठिकाणांच्या खाडी किनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार करण्यात आले होते. या पाँडच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी पाँडमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने दरवाजांची रचना करण्यात आली होती. आहोटी सुरू होताच, पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून, त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पाँडमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच झाला होता.या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत.सीबीडी विभागातील पाण्याचा निचरा होणाºया ठिकाणी सेक्टर १३ येथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या होल्डिंग पाँडमध्ये सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते. सीबीडी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळून होल्डिंगपाँडकडे वाहून जाणाºया पाण्याच्या मार्गाचीही स्वच्छता करण्यातआलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.>होल्डिंग पाँडची निर्मिती शहरच्या रक्षणाकरिता करण्यात आली होती, परंतु त्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यासाठी महासभा, स्थायी समिती सभेत आवाज उठविला होता, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- डॉ. जयाजी नाथमाजी नगरसेवक