शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

खारफुटीमुळे सीबीडीला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:18 IST

या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : गेली अनेक वर्षे सफाई न झाल्याने सीबीडीतील होल्डिंग पाँडमध्ये खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. त्यात होल्डिंग पाँड भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गेल्या काही वर्षांपासून सीबीडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत. या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना, मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी काय करता येईल, याचा सिडकोने सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर, नवी मुंबई शहरात सुमारे ११ ठिकाणांच्या खाडी किनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार करण्यात आले होते. या पाँडच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी पाँडमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने दरवाजांची रचना करण्यात आली होती. आहोटी सुरू होताच, पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून, त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पाँडमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच झाला होता.या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत.सीबीडी विभागातील पाण्याचा निचरा होणाºया ठिकाणी सेक्टर १३ येथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या होल्डिंग पाँडमध्ये सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते. सीबीडी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळून होल्डिंगपाँडकडे वाहून जाणाºया पाण्याच्या मार्गाचीही स्वच्छता करण्यातआलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.>होल्डिंग पाँडची निर्मिती शहरच्या रक्षणाकरिता करण्यात आली होती, परंतु त्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यासाठी महासभा, स्थायी समिती सभेत आवाज उठविला होता, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- डॉ. जयाजी नाथमाजी नगरसेवक