शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

तळोजा एमआयडीसीत अग्निसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:37 IST

गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

तळोजा : गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाची अग्निशमन यंत्रणा तोकडी पडत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांमधून समोर येत आहे.२०१७ मध्ये एकूण ६४ कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, यातील काही गंभीर होत्या. तर २०१८ मध्ये या ८५ आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यापैकी मेम्बाकेम, कैराव केमिकल्स, हौसीया कोल्डस्टोरेज, फोमहोम या कारखान्यांत गंभीर स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तळोजात औद्योगिक वसाहत सुमारे ९०० हेक्टर जागेत वसलेली असून, यात १२०० प्लॉटवर लहान-मोठे ९१५ कारखाने आहेत. यात बहुतांश रासायनिक कारखाने असून या कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे.तळोजा औद्योगिक परिसरातील अग्निशमन दलाकडे दोन अग्निशमन बंब असून, दोन अधिकारी व १८ कर्मचारी कार्यरत आहेत. ९१५ कारखान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमनच्या अवघ्या १८ कर्मचाºयांवर आहे, त्यामुळे कंपन्यांमधील अग्निरोधक यंत्रणा तपासणे, आग लागू नयेम्हणून उपाययोजना, जनजागृती होण्यात मनुष्यबळाअभावी मर्यादा येत आहेत.तळोजा औद्योगिक वसाहतीत कोल्ड स्टोरेज कारखान्यांची संख्याही मोठी आहे, यामध्ये वापरला जाणारा घातक अमोनिया वायुगळतीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच येथील नाईक ओशिअनिक कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे पाच कामगार जखमी झाले होते.अन्य यंत्रणांचा आधारएमआयडीसीतील ९१५ कंपन्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत अग्निशमन यंत्रणा अपुरी पडते. परिणामी, एखादी दुर्घटना घडली की, बाहेरील किंवा खासगी कंपन्यांच्या यंत्रणांची मदत घ्यावी लागते. आगीचे कॉल आल्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहत सोडून अंबरनाथ, डायघर, दहिसर, डोंबिवली या ठिकाणी यंत्रणा मागवावी लागते.जीवितहानीतळोजा औद्योगिक वसाहतीत २०१७ मध्ये ६४ तर २०१८ मध्ये जवळपास ८५ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. तर २०१६ मध्ये टिकिटार या कंपनीतील आगीच्या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला होता.फायर आॅडिट अहवालाबाबत अनभिज्ञकारखाना सुरू झाल्यानंतर अग्निशमन विभागाकडून दाखला दिला जातो. आणि दरवर्षी कंपनीकडून फायर आॅडिट करणे होणे बंधनकारक असते. मात्र तसे होत नसल्याचे अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे तळोजा अग्निशमनचा संपर्कक्रमांकही नाही. रासायनिक कंपन्या, कोल्ड स्टोरेज कंपन्यांनी अग्निसुरक्षेबाबत जागृती असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नाहीत, शिवाय संपर्कक्रमांकही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगीची घटना घडली की कर्मचारी १०० किंवा १०१ क्रमांकावर संपर्क साधतात. त्यांच्याकडून स्थानिक यंत्रणांना कळवले जाते, त्यामुळे अनेकदा घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे अग्निशमन दलातील कर्मचाºयांकडून सांगण्यात येते.तळोजा परिसरातील आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. अग्निसुरक्षेबाबत आम्ही कंपन्यांमध्ये जनजागृती करत आहोत. आगीच्या घटनांचे नेमके कारण काय? व घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत कारखानदारांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते.- दीपक दोरु गडे,अग्निसुरक्षा अधिकारी, तळोजा

टॅग्स :fireआग