शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:35 IST

कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा

पनवेल : कृषी महोत्सव सामान्य शेतकºयांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्र वारी कामोठेत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मत मांडले.कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने खांदेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय रायगड जिल्हा कृषी महोत्सव २0१८ -१९ चे उद्घाटन राज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्याकडून उत्पादनाविषयी माहिती घेतली त्याचबरोबर त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, कृषी विभाग शेतकºयांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करीत असून हा महोत्सव सामान्य शेतकºयांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्र म आहे, अशा शब्दात या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. खाडी व समुद्राच्या उधाणामुळे पीक धोक्यात असते, त्यामुळे त्यासाठी सक्षम पर्याय देणे ही काळाची गरज आहे, त्या अनुषंगाने कडधान्य पीक घेतले जात आहे.शेतीसोबत मत्स्य शेतीला प्राधान्य देणे ही गरज लक्षात घेता मागेल त्याला शेततळे देण्यात येत आहे. तरु णवर्ग स्थलांतरित होऊ नये, यासाठी शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; पण त्याची साठवणूक होत नाही हे लक्षात घेऊन साडेचार हजारपेक्षा जास्त वनबंधारे बांधण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती देतानाच धरण, तलाव आदी जलाशयातून लोकसहभातून साडेतीन लाखांपेक्षा मेट्रिक गाळ काढण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. विकासापासून दूर असलेल्या हिरवे गावात सरपंच पोपटराव यांनी शेतीला प्राधान्य देऊन गावाची प्रगती करून आदर्श दिला. तो आदर्श घेऊन शेतकºयांनी काम करावे, असा मौलिक सल्लाही दिला. त्याचबरोबर शेतकºयांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी या वेळी दिली.प्रास्ताविक कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी केले. या महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गटांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रदर्शनास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका हेमलता गोवारी, संतोषी तुपे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई