शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:25 AM

शहराच्या विकासामध्ये अल्प वाटा; स्वातंत्र्यानंतर केंद्राचा एकही मोठा प्रकल्प नाही

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईच्या विकासामध्ये लोकसभा सदस्यांचे योगदान मात्र अत्यंत अल्प आहे. खासदारांनी पाठपुरावा करून अद्याप एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेला नाही. किरकोळ विकासकामे करून त्यांचे श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा मात्र नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळत आहे.ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महापालिकेच्या रुग्णालयासाठी दिलेला निधी पालिकेने वापरला नाही. कोपरखैरणेमध्ये कब्रस्तानला दिलेल्या निधीला स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध केला. वाशीमध्ये सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचे नक्की श्रेय कोणाचे यावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरूनही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका मांडू लागले असून यानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर खासदारांनी नवी मुंबईच्या विकासामध्ये नक्की काय योगदान दिले याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे बेलापूर एमआयडीसीचा समावेश होतो. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती याच परिसरामध्ये आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून देशभर नावलौकिक आहे. परंतु या सर्व विकासामध्ये खासदारांचा वाटा मात्र अत्यंत अल्प राहिला आहे. ठाणे मतदार संघाचा भाग असलेल्या नवी मुंबईकडे खासदारांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीपुरतेच खासदार येथे जास्त लक्ष देत असल्याचा अनुभव शहरवासीयांना यापूर्वी आला आहे. केंद्र सरकारचा निधी शहरासाठी खेचून आणण्यासाठी फारसा प्रयत्न झालेला नाही. कोणताच महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरामध्ये घेऊन येण्यात यश आलेले नाही.ठाण्याचे आजी-माजी खासदारांनी रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तुर्भे, सानपाडा, बेलापूरमधील पुलाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला, परंतु त्यासाठीचा निधी महापालिकेलाच खर्च करावा लागला आहे.शवदाहिनीचा उपयोग नाहीशिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे चार वेळा ठाण्याचे खासदार होते. त्यांच्या खासदार निधीमधून डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली, परंतु त्या शवदाहिनीचा फारसा उपयोग झालाच नाही. सुरवातीला बेवारस प्रेत जाळण्यासाठी त्याचा उपयोग होत होता, परंतु सद्यस्थितीमध्ये शवदाहिनी बंद अवस्थेमध्येच आहे.गेस्ट हाउसचा उपयोग नाहीराष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर २००९ मध्ये निवडून आलेल्या संजीव नाईक यांच्या निधीमधून वंडर्स पार्कमध्ये गेस्ट हाउसची उभारणी व जॉगिंग ट्रॅकसह उद्यानामध्ये म्युझिक सिस्टीम सुरू करण्यात आली. या गेस्ट हाउसचा सर्वसामान्य नागरिकांना काहीही उपयोग होत नाही. गेस्टहाउसवर केलेला खर्च जनतेच्या दृष्टिकोनातून व्यर्थ गेला आहे.सानपाड्यातील लिफ्ट बंदच : विद्यमान खा. राजन विचारे यांनी त्यांच्या निधीमधून नेरूळ, सानपाडा, सीबीडी, घणसोली, ऐरोलीमध्ये विविध विकासकामे केली. यामध्ये सानपाडा दत्तमंदिर परिसरातील पादचारी पुलाला लिफ्टही बसवली आहे.याचे लोकार्पण नुकतेच झाले. परंतु ही लिफ्ट बंदच आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई