शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बालाजी मंदिराच्या बांधकाम मंजुरीचे कारण स्पष्ट करा; हरित लवादाचे CRZ ला निर्देश

By नारायण जाधव | Updated: February 19, 2024 13:19 IST

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी एनजीटीसमोर सीआरझेडच्या मंजुरीला आव्हान दिले होते.

नारायण जाधव

नवी मुंबई: नवी मुंबईतील उलवे किनारपट्टीवरील तिरुपती बालाजी मंदिराला किनारी नियमन क्षेत्रात कोणत्या आधारे  परवानगी दिली याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए) ला दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी एनजीटीसमोर सीआरझेडच्या मंजुरीला आव्हान दिले होते.  कुमार यांनी दावा केला होती की 40,000 चौरस मीटरचा भूखंड हा सीआरझेड प्रतिबंधित क्षेत्रात येतो आणि एमसीझेडएमएने सिडकोने भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडाची महत्त्वाची माहिती विचारात घेतली नाही. कुमार यांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांनी  एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठासमोर युक्तिवाद केला की मंदिराचा भूखंड मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) साठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कास्टिंग यार्डचा भाग आहे. कास्टिंग यार्डची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती, तर मागील वर्षीच्या गुगल अर्थ क्षेत्राच्या नकाशावर भरती-ओहोटीचे प्रभावशाली क्षेत्र, खारफुटी, पाणथळ आणि चिखल क्षेत्र  स्पष्टपणे दिसून येते. अगदी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर (MRSAC) नकाशाही याची पुष्टी करतो, असे भट्टाचार्य यांनी नमूद केले.

सिडकोच्या सदोष आणि बेकायदेशीर लीजमुळे जैवविविधता क्षेत्राचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कुमार यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे. शिवाय, कास्टिंग यार्ड क्षेत्र 2019 पर्यंत मासेमारी क्षेत्र होते, असा युक्तिवाद केला. 90 मिनिटांच्या सुनावणीनंतर, हरित लवादाचे न्यायिक सदस्य  न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या  खंडपीठाने सागर किनार प्राधिकरणाला मंदिरासाठी दिलेल्या बांधकाम मंजुरीची कारणे स्पष्ट करण्याचे  निर्देश दिले. 

पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे.

एमटीएचएल साठी तात्पुरत्या कास्टिंग यार्डच्या उद्देशाने प्रकल्पाच्या जागेचा वापर केल्याने बांधकाम, खारफुटीची गळती, डेब्रिजचे पुनर्वसन आणि डंपिंग आणि सखल भागात लँडफिलिंग असे स्पष्टपणे परिणाम झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे खंडपीठाने नोंदवले आहे. याचा परिणाम म्हणून विचाराधीन जमिनीची काही नैसर्गिक वैशिष्ट्ये बदलली गेली आणि "प्रदेशाच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या हानीशी तडजोड केली गेली", असे कुमार यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईenvironmentपर्यावरणTempleमंदिर