शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

निवडणुकीत जनतेला परिवर्तन अपेक्षित, गणेश नाईक यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:55 IST

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली आहे, त्यामुळे जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे.

नवी मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली आहे, त्यामुळे जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये मतदार चमत्कार घडवितील. या दोन्ही मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कासवाच्या भूमिकेत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.

शनिवारी सांयकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला. तत्पूर्वी नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही काही प्रमाणात कमी ठरल्याने २०१४ मध्ये मतदारांनी भाजप आणि शिवसेनेला संधी दिली; परंतु पाच वर्षांत या सरकारने सर्वच आघाड्यांवर जनतेची घोर निराशा केली आहे. त्यामुळे लोकांत परिवर्तनाचे वातवरण निर्माण झाल्याचे नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, पॉपर्टी कार्ड आणि सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्तांत काही प्रमाणात खदखद आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या काही संघटनांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. न्याय हक्कासाठी ठाम भूमिका मांडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांना बोगस म्हणून हिणवणाºया सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन नाईक यांनी केले. यावेळी शिवसेनेची देव, धर्म आणि देशाविषयीची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका त्यांनी केली. राजकीय द्वेषातून या मंदिरावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. बावखळेश्वर मंदिराबाबत शिरीष वेटा नावाच्या एका भाविकाने एक पुस्तिका लिहिली आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ती प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तकात काही आक्षेपार्ह असेल तर वेटा यांची खुशाल चौकशी करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

या वेळी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृहनेते रवींद्र इथापे, काँग्रेसचे संतोष शेट्टी आदी उपस्थित होते.

शहरातील भेडसावणाऱ्या समस्यांमुळे जनतेत नाराजीगरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, पॉपर्टी कार्ड आदी मुद्द्यावर प्रकल्पग्रस्तांमध्ये काही प्रमाणात खदखद आहे.

सिटी सर्व्हेक्षणाच्या मुद्द्यावरही अनेक वाद-विवाद सुरू असून काही संघटनानी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईनंतर काही पत्रके नवी मुंबई वितरित झाल्याची तक्रार शिवसेनेने पोलिसांकडे केली आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGanesh Naikगणेश नाईकthane-pcठाणे