शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

By नारायण जाधव | Updated: August 2, 2023 14:52 IST

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे. 

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करणे सोपे होणार आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षापासून ती करायची असल्याने या स्मारकांची दुरवस्था दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. जागतिक वारसा असलेली अजिंठा-वेरुळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उभे राहिलेले रायगड व सिंधुदुर्ग यांसारखे किल्ले, यादव व मराठाकाळात उभी राहिलेली व सुंदर शिल्पाकृतींनी नटलेली श्री मार्कंडेय व त्र्यंबकेश्वर यांसारखी मंदिरे, मध्ययुगीन मकबरे तसेच वसाहतकालीन स्थापत्यांचा समावेश आहे. यापैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने २८८ स्मारके राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जतन केली आहेत.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील ३८६ स्मारके संरक्षित म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये घटोत्कच व धाराशीवणी, राजगड, सिंहगड, माणिकगड यांच्यासारखे किल्ले तसेच जेजुरी, नीरा नृसिंहपूर, श्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरे, लोकमान्य टिळक, सावरकर यांची जन्मस्थळे, गेट वे ऑफ इंडिया यांचा  समावेश  आहे.

बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करणे सोपे होणार आहे.

कामे करताना यांना द्यावे प्राधान्यस्मारकांचा कालखंड, स्मारकाची सद्य:स्थिती, भेट देणाऱ्या पर्यटकांची/भाविकांची संख्या, स्थानिक नागरिक/लोकप्रतिनिधी/संशोधकांची मागणी

ही कामे करता येणारपरीरक्षणासह जतन व संवर्धन, देखभाल दुरुस्ती, पर्यटक/भाविकांसाठी सोयीसुविधा (स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी इ.), सुशोभीकरण, रासायनिक जतन कामे, माहितीफलक, दिशादर्शक बसविणे.

‘पुरातत्त्व’ची परवानगी लागणार कामे करण्यासाठी सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग यांची परवानगी लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतच्या प्रस्तावांना नियोजन समितीकडून मान्यता घ्यायची आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर मंजूर निधी जिल्हाधिकारी संबंधित सहायक संचालक पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पाठवून त्यांच्याकडून प्रस्तावित कामे करून घ्यायची आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई