शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही परीक्षा? विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:27 AM

मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने कायद्याचे धडे घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा याचा पेच पडला आहे.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने कायद्याचे धडे घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा याचा पेच पडला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही तरी मात्र परीक्षा कशा घेतल्या जातात, असा सवाल स्टुडंट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने केला आहे.येत्या २९ जानेवारीपासून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एलएलबीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र प्रवेशाला ६० दिवस देखील पूर्ण झालेले नसताना या परीक्षा घेतल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांच्या वतीने केला जात आहे. पुनर्मूल्यांकनाला झालेली दिरंगाई त्यानंतर प्रवेशही उशिरानेच झाले, परिणामी अभ्यासवर्गालाही उशिरानेच सुरुवात झाली. आता कुठे प्रवेश घेऊन महिना उलटत नाही तोवर परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शिल्लक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्येही जादा तासिका घेतल्या जात असून विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण दिला जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. या अगोदरही ५० टक्के विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल प्रलंबित राहिल्याने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर त्यानंतर वेळापत्रक बदलण्यात आले होते. प्रथम वर्षाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न लक्षात घेता या परीक्षा जानेवारीऐवजी फेब्रुवारीत घ्याव्यात, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली. येत्या काहीच दिवसात एलएलबी प्रवेशाची चौथी यादी जाहीर केली जाणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर आंदोलनात्मक भूमिका पुकारण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. स्टुडंट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, अजून उत्तर आलेले नाही याचा संताप व्यक्त केला जात आहे.मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे, तसेच मेरी ट्रॅक कंपनीला दिलेल्या टेंडरमुळे जो काही गोंधळ झाला त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच आताही विद्यापीठ प्रशासन फक्त परीक्षा घेण्याच्या मागे लागले आहे. ९० दिवसांचा परीक्षा कालावधी असणारा विद्यापीठाचा कायदा विद्यापीठ पाळत नाही याची खंत वाटते. आधी जो प्रकार घडला पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून घडत आहे. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का सहन करावी ?- सचिन पवार,अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

टॅग्स :examपरीक्षाNavi Mumbaiनवी मुंबई