शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

By admin | Updated: July 9, 2016 03:40 IST

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. एका पिढीचा दुर्दैवी अंत झाल्यानंतरही शासकीय यंत्रणा लालफितशाहीमधून बाहेर येत नाही. अजून किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागणार, असा आर्त प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. ‘लोकमत आपल्या दारी उपक्रमा’अंतर्गत वाशीमधील धोकादायक इमारतींमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील झोपडपट्टी, चाळ व इमारतींमधील छोटे घर विकून नागरिकांनी नवी मुंबईमध्ये वाशी सारख्या महत्त्वाच्या विभागात घरे खरेदी केली. घर घेतल्यानंतर एक ते दोन वर्षांमध्येच त्यामध्ये गळती सुरू झाली. तेव्हापासून इमारतींच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू झाला. दुरूस्ती झाली नाहीच, परंतु या इमारती धोकादायक झाल्या. पालिकेने त्यांना धोकादायक घोषित करून नागरिकांना त्या खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. जवळपास १५ वर्षे येथील नागरिक पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकांना मानसिक त्रास सुरू झाला. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर अनेक गंभीर आजाराने ग्रासले. वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटला नसल्यामुळे नैराश्य येवून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा रखडलेल्या पुनर्विकासामुळे बळी गेला आहे. नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम राहण्यासाठी आलेल्या एक पिढीचा अंत झाला असून अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन हा प्रश्न मार्गी लावणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. तुम्ही घरे खाली करा, नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर काढून इमारती पाडून टाकू असा इशारा दिला जात आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मिळविण्यासाठी तब्बल १५ वर्षे सरकार दरबारी शेकडो हेलपाटे घालावे लागले. वर्षानुवर्षे आश्वासनांवर बोळवण केली जात होती. निवडणुका आल्या की एफएसआयचा विषय चर्चेत येतो. निवडणुका संपल्या की मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून जगणाऱ्या नागरिकांच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केले. परंतु अद्याप एकही प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. धोकादायक इमारतींचे स्लॅब वारंवार कोसळू लागले आहेत. श्रद्धा, जेएन १, पंचरत्नसह अनेक सोसायटीमधील रहिवाशांनी घरे खाली केली आहेत. श्रद्धा सोसायटीमधील रहिवासी तब्बल १६ वर्षे संक्रमण शिबिरामध्ये वास्तव्य करीत आहेत. एक पिढी संपली, दुसऱ्या पिढीला तरी स्वत:चे घर मिळणार का, अशी विचारणा रहिवासी करत आहेत. रखडलेल्या पुनर्विकासाचे बळी आर. कार्व्हलो, नारायण शिंदे, इसाक मनीकम, बनारसी पात्रे, रवींद्रनाथ नायर, भंडारीदेवी पालीवाल, शांतीबेन पटेल, लक्ष्मी नारायण म्हात्रे, मगन भालेराव व त्यांचे कुटुंब, राम स्वरथ सिंग, अनंत पाटील, सुरेश कुदळे, बसेरा, द्वारका कडू, आदम शेख, गिरीश सिंग, नजीर मोहमद, आशा हुले, गौतमकुमार दत्ता, शिखा दत्ता, केशव सोनावणे, नागेश कांबळे, सुनीलकुमार महेश्वरी, सखुबाई पोटे. मृत्यू सत्र थांबविण्याची गरज धोकादायक इमारत पडल्यानंतरच नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत. अपघाताची कायम टांगती तलवार असल्यामुळे मानसिक ताण वाढून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इमारतींचा पुनर्विकास कधी होणार असा प्रश्न रहिवासी वारंवार विचारत आहेत. सिडको, महापालिका व शासनाकडेही पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश येत नाही. नैराश्यामुळे व ग्रासलेल्या आजारामुळे ३० वर्षांपूर्वी येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे. धोकादायक इमारतीसेक्टर १ : बी टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन बी १६, बी ३, बी ६, बी २, बी ५, बी १२, बी १, बी २७, बी १७, बी १८, बी ११, बी ८, बी ४, डी १, डी २, डी ३, डी ४, लोकमान्य टिळक मार्केट सेक्टर २ : मेघराज, मेघदूत टॉकीज, सी २ टाईपच्या इमारत क्रमांक १, ४, ५, ३सेक्टर ५ :राष्ट्रीय कामगार रुग्णालय इमारत क्रमांक १, २, ३, ४सेक्टर ९ : अवनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी इ. क्र. ४७ ते ५८, श्रद्धा सोसायटी २२ ते ४४, एकता सोसायटी १ ते १८, कैलास सोसायटी १९ ते ४५, जय महाराष्ट्र ओनर्स असोसिएशन ३१ ते ४६, आशीर्वाद सोसायटी २, ४ ते १८, गुलमोहर सोसायटी ६४ ते ८१, एफ टाईप ओनर्स असोसिएशनसेक्टर १५ : दत्तगुरू नगर सोसायटी बी १० मधील इमारत क्रमांक ३२, ३६, ५०, ५६, ४५सेक्टर १४ : डॅफोडाईल सोसायटी, सोमेश्वर सोसायटी इमारत क्रमांक २९ ते ३२, ३५, ३७, २५, सिद्धिविनायक सोसायटीमधील इमारत क्रमांक १०, १७, १८, २१, २२, कुमकुम सोसायटी. सेक्टर १६ : सी टू टाईपमधील इमारत क्रमांक १ ते १९ सेक्टर २६ : ओमकार सोसायटी ए १ ते ए २०, महाराष्ट्र को-आॅप हौसिंग सोसायटी इ. क्र. ६५ ते ११५, हॅपी होम सोसायटी डी ११६ ते १३९, प्रगती सोसायटी ई १४०, १६१, वसंत विहार सहकारी संस्था एफ १६२ ते १८३