शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

By admin | Updated: July 9, 2016 03:40 IST

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. एका पिढीचा दुर्दैवी अंत झाल्यानंतरही शासकीय यंत्रणा लालफितशाहीमधून बाहेर येत नाही. अजून किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागणार, असा आर्त प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. ‘लोकमत आपल्या दारी उपक्रमा’अंतर्गत वाशीमधील धोकादायक इमारतींमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील झोपडपट्टी, चाळ व इमारतींमधील छोटे घर विकून नागरिकांनी नवी मुंबईमध्ये वाशी सारख्या महत्त्वाच्या विभागात घरे खरेदी केली. घर घेतल्यानंतर एक ते दोन वर्षांमध्येच त्यामध्ये गळती सुरू झाली. तेव्हापासून इमारतींच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू झाला. दुरूस्ती झाली नाहीच, परंतु या इमारती धोकादायक झाल्या. पालिकेने त्यांना धोकादायक घोषित करून नागरिकांना त्या खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. जवळपास १५ वर्षे येथील नागरिक पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकांना मानसिक त्रास सुरू झाला. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर अनेक गंभीर आजाराने ग्रासले. वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटला नसल्यामुळे नैराश्य येवून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा रखडलेल्या पुनर्विकासामुळे बळी गेला आहे. नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम राहण्यासाठी आलेल्या एक पिढीचा अंत झाला असून अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन हा प्रश्न मार्गी लावणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. तुम्ही घरे खाली करा, नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर काढून इमारती पाडून टाकू असा इशारा दिला जात आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मिळविण्यासाठी तब्बल १५ वर्षे सरकार दरबारी शेकडो हेलपाटे घालावे लागले. वर्षानुवर्षे आश्वासनांवर बोळवण केली जात होती. निवडणुका आल्या की एफएसआयचा विषय चर्चेत येतो. निवडणुका संपल्या की मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून जगणाऱ्या नागरिकांच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केले. परंतु अद्याप एकही प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. धोकादायक इमारतींचे स्लॅब वारंवार कोसळू लागले आहेत. श्रद्धा, जेएन १, पंचरत्नसह अनेक सोसायटीमधील रहिवाशांनी घरे खाली केली आहेत. श्रद्धा सोसायटीमधील रहिवासी तब्बल १६ वर्षे संक्रमण शिबिरामध्ये वास्तव्य करीत आहेत. एक पिढी संपली, दुसऱ्या पिढीला तरी स्वत:चे घर मिळणार का, अशी विचारणा रहिवासी करत आहेत. रखडलेल्या पुनर्विकासाचे बळी आर. कार्व्हलो, नारायण शिंदे, इसाक मनीकम, बनारसी पात्रे, रवींद्रनाथ नायर, भंडारीदेवी पालीवाल, शांतीबेन पटेल, लक्ष्मी नारायण म्हात्रे, मगन भालेराव व त्यांचे कुटुंब, राम स्वरथ सिंग, अनंत पाटील, सुरेश कुदळे, बसेरा, द्वारका कडू, आदम शेख, गिरीश सिंग, नजीर मोहमद, आशा हुले, गौतमकुमार दत्ता, शिखा दत्ता, केशव सोनावणे, नागेश कांबळे, सुनीलकुमार महेश्वरी, सखुबाई पोटे. मृत्यू सत्र थांबविण्याची गरज धोकादायक इमारत पडल्यानंतरच नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत. अपघाताची कायम टांगती तलवार असल्यामुळे मानसिक ताण वाढून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इमारतींचा पुनर्विकास कधी होणार असा प्रश्न रहिवासी वारंवार विचारत आहेत. सिडको, महापालिका व शासनाकडेही पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश येत नाही. नैराश्यामुळे व ग्रासलेल्या आजारामुळे ३० वर्षांपूर्वी येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे. धोकादायक इमारतीसेक्टर १ : बी टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन बी १६, बी ३, बी ६, बी २, बी ५, बी १२, बी १, बी २७, बी १७, बी १८, बी ११, बी ८, बी ४, डी १, डी २, डी ३, डी ४, लोकमान्य टिळक मार्केट सेक्टर २ : मेघराज, मेघदूत टॉकीज, सी २ टाईपच्या इमारत क्रमांक १, ४, ५, ३सेक्टर ५ :राष्ट्रीय कामगार रुग्णालय इमारत क्रमांक १, २, ३, ४सेक्टर ९ : अवनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी इ. क्र. ४७ ते ५८, श्रद्धा सोसायटी २२ ते ४४, एकता सोसायटी १ ते १८, कैलास सोसायटी १९ ते ४५, जय महाराष्ट्र ओनर्स असोसिएशन ३१ ते ४६, आशीर्वाद सोसायटी २, ४ ते १८, गुलमोहर सोसायटी ६४ ते ८१, एफ टाईप ओनर्स असोसिएशनसेक्टर १५ : दत्तगुरू नगर सोसायटी बी १० मधील इमारत क्रमांक ३२, ३६, ५०, ५६, ४५सेक्टर १४ : डॅफोडाईल सोसायटी, सोमेश्वर सोसायटी इमारत क्रमांक २९ ते ३२, ३५, ३७, २५, सिद्धिविनायक सोसायटीमधील इमारत क्रमांक १०, १७, १८, २१, २२, कुमकुम सोसायटी. सेक्टर १६ : सी टू टाईपमधील इमारत क्रमांक १ ते १९ सेक्टर २६ : ओमकार सोसायटी ए १ ते ए २०, महाराष्ट्र को-आॅप हौसिंग सोसायटी इ. क्र. ६५ ते ११५, हॅपी होम सोसायटी डी ११६ ते १३९, प्रगती सोसायटी ई १४०, १६१, वसंत विहार सहकारी संस्था एफ १६२ ते १८३