शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे पदपथावर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:54 IST

विभाग कार्यालयाचे अभय? : दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा

नवी मुंबई : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर बस्तान ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यात पदपथांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागत आहे. वाशी व कोपरखैरणे विभागात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत, त्यानुसार फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी दिवसभर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर फेरीवाले दिसत नाहीत. मात्र, सायंकाळनंतर फेरीवाल्यांना पदपथ मोकळे करून दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ७ वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी विभागातील पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रात्री १०.३० वाजेपर्यंत पदपथांवर या फेरीवाल्यांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे पदचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

वाशी सेक्टर ९ परिसरात हा प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच नेरुळ आणि सानपाडा परिसरात फेरीवाल्यांकडून सायंकाळच्या वेळी होणारे
अतिक्रमण रहिवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक
विभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या आशीर्वादाने सायंकाळनंतर पदपथांवर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांचा ताप स्वच्छता कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. हे फेरीवाले परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी करतात. घनकचरा तेथेच टाकून निघून जातात. सडलेला भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक व इतर घनकचºयाचे ढीग साचत असल्याने सकाळी दैनंदिन साफसफाई करणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका