शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

घणसोलीतील आठवडे बाजारच्या विरोधात एल्गार; तरुणांची सोशल मीडियावर जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 00:05 IST

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

- अनंत पाटील नवी मुंबई : ब्रिटिश काळातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या घणसोली गावात आठवडे बाजारामुळे चोऱ्या माऱ्यांच्या प्रकार वाढले आहेत. वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे चालणारा घणसोलीतील संडे बाजार बंद करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना अलीकडेच एक निवेदन दिले आहे.

घणसोली सद्गुरू रुग्णालय, सरपंच दगडू चाहू पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते डी-मार्ट मॉल परिसर, गावदेवीवाडी रोड ते स्वातंत्र्यसंग्राम चौकपर्यंत दर रविवारी आठवडे बाजार भरविला जातो. मुख्य रस्त्यावरच हा बाजार भरत असल्याने त्याचा फटका येथील दळणवळणाला बसत आहे. प्रत्येक रविवारी जवळपास अडीच हजार फेरीवाले येथील रस्त्यावर अतिक्रमण करतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही आंबटशौकीन तरुणांकडून महिलांना धक्काबुक्की केली जाते. अनेकदा महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे जुजबी कारण देऊन महापालिकेचे अधिकारी कारवाईकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात याच आठवडे बाजारावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी तीन वेळा कारवाई केली होती. घणसोलीतील अतिक्रमण विभागातील काही अधिकाºयांचे या फेरीवाल्यांशी लागेबांधे असल्यामुळे त्यानंतर आजपर्यंत या आठवडे बाजारावर कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

घणसोलीतील सरपंच दगडू चाहू पाटील चौकाला या फेरीवाल्यांनी अक्षरश: विळखा घातला आहे. दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत रस्त्यावरून चालताही येत नाही. एखाद्या वेळी गावात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी किवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे अवघड होणार आहे. संडे बाजारामुळे घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.

फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पालिकेच्या पोर्टलवर आठवडे बाजार कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आता गावातील तरुणपिढी पुढे सरसावली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्यक्षात पाहणी करून बाजार त्वरित बंद करावा, किंवा वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन हा बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडुरंग नाईक यांनी केली आहे.

टॅग्स :MarketबाजारSocial Mediaसोशल मीडियाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका