शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इलेव्हेटेड मार्ग गुंडाळले, कळवा-दिघा भूसंपादनात अडकला

By नारायण जाधव | Updated: June 11, 2025 12:57 IST

मध्य रेल्वेने सीबीटीसी योजनेस सुरुवात करून रेकमध्ये किरकोळ वाढ केली असली तरी तिचा विस्तार आता कर्जत-खोपोली- उरण-पनवेलपर्यंत झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महामुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई  - मध्य रेल्वेने सीबीटीसी योजनेस सुरुवात करून रेकमध्ये किरकोळ वाढ केली असली तरी तिचा विस्तार आता कर्जत-खोपोली- उरण-पनवेलपर्यंत झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महामुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही. शिवाय कळवा-दिघा मार्ग कूर्म गतीने सुरू असून, इलेव्हेटेड मार्ग गुंडाळल्याने लोकल प्रवाशांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.

लोकल वेळेवर धावण्यासाठी मध्य रेल्वेने सीबीटीसी अर्थात सिग्नल बेस ट्रान्सपोर्ट सिस्टीम टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे.  याचा खर्च रेल्वे आणि राज्य शासनाने उचलला आहे. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने नगरविकास विभागाने हा खर्च मुंबई, नवी मुंबई, पनवेल महापालिकेसह सिडकोवर ढकलला आहे. रेल्वेचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्यावर हे देशातील पहिलेच उदाहरण असावे.

हे कमी म्हणून की काय काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ठाणे-दिवा-कल्याण मार्गावर पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाली तरी तिचा लोकल प्रवाशांसाठी म्हणावा तसा फायदा होत नाही. 

कल्याणहून डायरेक्ट नवी मुंबईला जोडणारा रेल्वे मार्गही भूसंपादनाच्या गर्तेत अडकला आहे. कळव्यातील मफतलाल कंपनीच्या  जागेवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनावरून हे काम रखडले आहे. हा मार्ग कल्याणसह कर्जत-कसाऱ्याहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना  नवी मुंबईत ये-जा साठी ठाण्याला जाण्याची गरज भासणार नाही. यात प्रवाशांचा वेळ वाचणार असून, ठाणे स्थानकावरील ताणसुद्धा कमी होणार आहे.

इलेव्हेटेड मार्ग गुंडाळलेलोकल मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते कल्याण आणि पनवेल इलेव्हेटेड मार्गांची शिफारस केली होती. यातील मुंबई-कल्याण मार्ग तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविला होता. हे दोन्ही मार्ग रेल्वे मंत्रालयाने गुंडाळले आहेत. एमयुटीपी योजनेत हे मार्ग बांधण्याची योजना होती. 

प्रभूंच्या सूचनेवरून नियुक्त समितीच्या अहवालाचे काय?नवी मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघातानंतर लोकल अपघातांवर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सुचविलेला २० ते २१ हजार कोटी रुपयांच्या मेकओव्हर योजनेचा अहवाल कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वेने २०१५ मध्ये प्रभू यांच्या सूचनेनंतर रुळांवर होणाऱ्या मृत्यूच्या अभ्यासासाठी समिती नेमली होती. ठाण्याजवळ दरवाजात लटकलेल्या भावेश नकातेचा मृत्यू झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर स्थापन केलेल्या समितीने मेकओव्हर योजनेचा अहवाल सादर केला होता. त्याच्या अंमलबजावणीची मागणी नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी केली.मध्य रेल्वेवर विविध कारणांमुळे दररोज दहा लोकांचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी होतात. प्रवासीसंख्या आणि लोकल संख्येत तफावत आहे. यामुळे १५० नवीन रेकचे अधिग्रहण, लोकलसाठी स्टॅबलिंग लाइन (किंवा पार्किंगची ठिकाणे) बांधणे, ट्रॅक आणि रस्त्यावरील पुलांना कुंपणासह सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनासह पार्किंगअभावी लोकलला होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले होते. पनवेलसाठी, कर्जत आणि रोहापर्यंत सेवा विस्तारित करण्याचे सूचविले होते. 

काय होते अहवालात?अहवालातील मुख्य शिफारशींपैकी एक म्हणजे ‘लूप सिस्टिम’ तयार करणे. ज्याद्वारे स्टेशनवर थांबणारी ट्रेन पुढे जाऊ शकते आणि ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी यू-टर्न घेऊ शकते. सध्या, दुसरी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी रेक मागे फिरवून तो ट्रॅक बदलावा लागतो.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे