शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शहरातील पर्यावरणपूरक दाहिन्या धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:21 IST

नवी मुंबई महापालिका प्रशासनाची उदासीनता : फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध

योगेश पिंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकविसाव्या शहरातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात अंत्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात नसल्याने, त्या धूळखात पडलेल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अंत्यविधीसाठी शहरात फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध असून, कोरोनासाख्या परिस्थितीही याच पर्यायाचा वापर केला जात आहे.नवी मुंबई शहरातील प्रत्येक विभागात महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तुर्भे येथे डिझेल, नेरुळ येथे गॅस, तर करावे येथे इलेक्ट्रिक दाहिनीची निर्मिती करण्यात आली होती. या दाहिन्यांच्या निर्मितीसाठी खासगी सामाजिक संस्थांनी खर्च केला होता, परंतु या दाहिनींची महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वापरही झाला नसल्याने पर्यावरणपूरक दाहिन्या वापराविना कालांतराने बंद अवस्थेत आहेत. करावे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीतील पर्यावरणपूरक दाहिनी गेल्या वर्षी पुन्हा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करून गॅस दाहिनी साकारण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात या एकमात्र पर्यावरणपूरक दाहिनीचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या आदी महापालिकांमध्ये अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात आहे, परंतु स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई महापालिकेची करावे स्मशानभूमी वगळता, इतर सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी आजही फक्त लाकडांचाच पर्याय उपलब्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, मीठ, गोवºया, रॉकेल आदी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. लाकडांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची नागरिकांची मानसिकता असली, तरी काळानुरूप यात बदल होताना दिसत आहे. कोरोनासारख्या परिस्थिती पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यामुळे सुरक्षेला धोका आहे, परंतु पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध नसल्याने धोका पत्करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. लाकडांसाठी महापालिकेच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात आहेत.पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्नच्नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.च्कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारख्या प्रदूषणमुक्त पर्यावरणाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली होती, परंतु अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्या विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.करावे येथील स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी सुरू आहे. शहरात इतर ठिकाणीही पर्यावरणपूरक दाहिन्या निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, न.मुं.म.पा.