शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शहरातील पर्यावरणपूरक दाहिन्या धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:21 IST

नवी मुंबई महापालिका प्रशासनाची उदासीनता : फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध

योगेश पिंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकविसाव्या शहरातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात अंत्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात नसल्याने, त्या धूळखात पडलेल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अंत्यविधीसाठी शहरात फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध असून, कोरोनासाख्या परिस्थितीही याच पर्यायाचा वापर केला जात आहे.नवी मुंबई शहरातील प्रत्येक विभागात महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तुर्भे येथे डिझेल, नेरुळ येथे गॅस, तर करावे येथे इलेक्ट्रिक दाहिनीची निर्मिती करण्यात आली होती. या दाहिन्यांच्या निर्मितीसाठी खासगी सामाजिक संस्थांनी खर्च केला होता, परंतु या दाहिनींची महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वापरही झाला नसल्याने पर्यावरणपूरक दाहिन्या वापराविना कालांतराने बंद अवस्थेत आहेत. करावे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीतील पर्यावरणपूरक दाहिनी गेल्या वर्षी पुन्हा एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करून गॅस दाहिनी साकारण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात या एकमात्र पर्यावरणपूरक दाहिनीचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या आदी महापालिकांमध्ये अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्यांचा वापर केला जात आहे, परंतु स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई महापालिकेची करावे स्मशानभूमी वगळता, इतर सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी आजही फक्त लाकडांचाच पर्याय उपलब्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, मीठ, गोवºया, रॉकेल आदी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. लाकडांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची नागरिकांची मानसिकता असली, तरी काळानुरूप यात बदल होताना दिसत आहे. कोरोनासारख्या परिस्थिती पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यामुळे सुरक्षेला धोका आहे, परंतु पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध नसल्याने धोका पत्करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. लाकडांसाठी महापालिकेच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात आहेत.पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्नच्नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.च्कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारख्या प्रदूषणमुक्त पर्यावरणाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली होती, परंतु अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक दाहिन्या विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.करावे येथील स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी सुरू आहे. शहरात इतर ठिकाणीही पर्यावरणपूरक दाहिन्या निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, न.मुं.म.पा.