शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
3
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
4
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
5
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
6
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
7
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
8
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक, दमदार लूक समोर
9
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
10
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
11
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
12
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
13
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
14
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
15
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
16
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
17
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
18
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

पनवेल परिसराच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:51 AM

नवीन पनवेल, कळंबोलीत पाणीटंचाई : एमजेपीच्या ढिसाळ कारभाराचा फटका

कळंबोली : कडक ऊन आणि त्यामध्ये कमालीच्या पाणीटंचाईला पनवेलकरांना सामोरे जावे लागत आहे. एमजेपीच्या ढिसाळ नियोजनामुळे कळंबोली, नवीन पनवेलमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाण्याची कमतरता भासत आहे. रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.भोकरपाडा ते पनवेल या दरम्यानच्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाउन घेतला जात आहे. त्याचबरोबर पाताळगंगा नदीत टाटा पॉवर कंपनी पाणी सोडते. तेच पाणी पनवेलकरांना पिण्यासाठी दिले जाते. मात्र, सुटीच्या दिवशी वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी नदीच्या पात्रात येत नाही. रविवारी त्यामुळे पाताळगंगा नदीत पाणी नसल्याने एमजेपीकडून पाणी मिळाले नाही. शनिवारी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकरिता शटडाउन घेण्यात आला होता. त्याचा परिणाम सोमवारी जाणवला. अतिशय कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी भोकरपाडा येथे महावितरण कंपनीने मान्सनपूर्व कामाकरिता शटडाउन घेतल्याने दिवसभर वीज बंद होती. या कारणाने पनवेल आणि सिडको वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. या कारणाने पनवेलसह कळंबोली, नवीन पनवेलमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली.रहिवासी पाण्यासाठी बादल्या आणि हंडे घेऊन फिरताना दिसले. काहींनी पिण्याकरिता दुकानातून मिनरल वॉटर घेतले. कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे, चंद्रहास सोनकुसरे यांनी टंचाईच्या ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोनही अधिकाºयांनी मोबाइल बंद करून ठेवले त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.सिडकोच्या घरातील रहिवाशांचे हालनवीन पनवेल, खांदा वसाहतीत सिडकोने उभारलेल्या इमारतीत पाण्याच्या टाक्यांची सोय नाही. त्यामुळे पाणी साठवणूक करता येत नाही, त्यामुळे रहिवाशांचे टंचाईच्या काळात हाल होत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-१७मध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे. वरच्या मजल्यांना पाणीच जात नसल्याने अनेक ठिकाणी ज्येष्ठांना पाणी घरी घेऊन जावे लागत आहे. हीच स्मार्ट सिटी आहे का? असा सवाल माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत पाणी येत नाही, त्यामुळे सर्व नित्यक्र म बिघडला आहे, स्वयंपाक करण्यापासून ते कपडे व इतर कामे करता येत नाहीत. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे.- मंगला भैरू पवार, गृहिणी, कळंबोलीएमजेपी, टाटा पॉवर आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून कोणतीच माहिती मिळत नाही, त्यामुळे नियोजन करता येत नाही. त्यामुळे सिडकोला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.- दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, सिडकोनवीन पनवेलमधील पीएल-६मध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची अडचण आहे. अनेकांनी दोन ते तीन दिवस अंघोळ केलेली नाही. पाणी नसल्याने सर्वच कामे खोळंबली आहेत, मुलांना शाळेत सुट्ट्या आहेत म्हणून तरी ठीक आहे, नाही तर मोठी अडचण झाली असती.- संतोष सुतार, रहिवासी, नवीन पनवेल

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई