शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

राज्यात दुष्काळ, नवी मुंबईत मात्र पाण्याचा सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:33 PM

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव; उपाययोजनांअभावी हजारो लीटर पाणी जातेय वाहून

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू असताना नवी मुंबई शहरात मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहने धुणे, सोसायट्यांमधील बाग-बगिचे, सोसायटीचे आवर पाण्याने धुऊन स्वच्छ करणे आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी केली जात आहे. या वर्षी पाणी वापराबाबत महापालिकेच्या माध्यमातूनही जनजागृतीचा केली जात नसून पाण्याच्या होणाऱ्या नासाडीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई सुरू असून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणात मात्र पाण्याचा मुबलक साठा असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडीही होत आहे. मुबलक पाणीसाठा असलेल्या शहराशेजारील पनवेल महापालिका हद्दीमध्येही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आदिवासी पाड्यांमधील भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नवी मुंबई शहरात दरवर्षी पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते; परंतु यावर्षी राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा आभाव आहे. अवघ्या ५० रु पयांत ३० हजार लीटर पाणीवाटप करणाºया नवी मुंबई शहरातील शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी, सिडको आणि खासगी वसाहतींमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असून दररोज हजारो लीटर पाणी वाया घालविले जात आहे. शहरातील हॉटेल्समध्येही आवाराची स्वच्छता करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जात आहे. शहरात सुरू असलेली बांधकामे, वाहनांची व सोसायट्यांच्या आवाराची स्वच्छता, सोसायट्यांमधील बाग-बगिच्यांना पाणी, पाणीगळती आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडेदेखील महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने शहरात सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली आहे.

या शौचालयांमध्ये पाण्याची सोय करण्याच्या अनुषंगाने टाक्या बसविण्यात आल्या आहेत; परंतु पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरल्यावर पाणी बंद करण्याची सुविधा आणि यंत्रणा नसल्याने अनेक टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाण्याची नासाडी होत आहे, तसेच अनेक खासगी सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असून, पाण्याची नासाडी होत आहे. शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

मोरबेच्या पाण्याचा तपशीलनवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घन मीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाण्याची शहराला गरज आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात ७४.६६ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा नवी मुंबई शहराला सुमारे १२ सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे.