जि. प.त भाजप,बविआ आघाडी
By Admin | Updated: February 17, 2015 22:48 IST2015-02-17T22:48:39+5:302015-02-17T22:48:39+5:30
भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़

जि. प.त भाजप,बविआ आघाडी
पालघर : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा सेना युतीत फूट पडल्याने भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़
ठाणे जिल्हयाच्या विभाजना नंतर पालघर जिल्हा परीषदेची निर्मिती करण्यांत आल्या नंतर पालघर नव्या जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका २८ जानेवारी रोजी घेण्यांत आल्या असून ३० जानेवारीच्या मतमोजणीत पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागा पैकी २१ जागावर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले असून शिवसेनेचे १५ सदस्य तर बहुजन विकास आघाडीचे १० सदस्य असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ५ जागा हस्तगत केल्या आहेत़ तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य व कॉगें्रस व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत जागा वाटपा वरून बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी विरोधात उमेदवार उभे करून निवडणुका लढविल्या़ एकाही पक्षाला बहुमत प्राप्त करता न आल्याने किमान पदाधिकारी निवडीच्या वेळी तरी युतीत समेट घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यांत येत होती़ मात्र निवडणूकीच्या आदल्या सायंकाळ पर्यंत भाजपा सेनेत समेटा ऐवजी बेबनाव दिसत होता. जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष म्हणून अध्यक्षपदावरील भाजपाचा दावा सेनेने मान्य केला असला तरी उपाध्यक्षपद व स्टॅडींग समिती व बांधकाम समितीचे चेअरमनपद शिवसेनेला मिळावे यासाठी गेले पांच दिवस वाटाघाटी सुरू होत्या़ त्या निष्फळ ठरल्याने शेवटी कमळाबार्इंनी बहुजन विकास आघाडीची म्होतूर लावणे पसंत केले. त्यामुळे भविष्यात जि.प.त खडाजंगी सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
४ जि.प.तील सत्ता वाटपाचा मुद्दा अखेर राज्य पातळीवरील नेत्याकडे नेण्यांत आला मात्र तेथेही आज सांयकाळ पर्यंत निर्णय झाला नाही़ भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे़ पालघरचे पालक मंत्री विप्णु सावरा व खासदार चिंतामण वनगा़ जिल्हाध्यक्ष बाबा काठोळे़ तर सेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार अनिल देसाई व सेनेचे प्रदेश कार्यालयीन प्रमुख मिलींद नार्वेकर यांच्या १६ तारखेच्या तसेच दोनही पक्षांच्या आजच्या बैठकीत देखील काही निष्पन्न झाले नाही. तर आमची वरीष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे दोन्ही पक्ष म्हणत होते.