शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

महापे आदिवासी पाड्यात पालिकेची डिजिटल शाळा; बोलक्या भिंतींची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 23:33 IST

गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यातील नवी मुंबई महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीसाठी तसेच डिजिटल क्लासरूम बनविण्यासाठी सीएसआर फंड आणि आमदार निधीचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्र मानुसार बोलक्या भिंतींची निर्मिती करण्यात आली आहे.

महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यात १९६२ साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची कौलारू आणि पत्र्याची शाळा होती. महापालिकेच्या माध्यमातून या शाळेत बालवाडी ते आठवीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत आदिवासी समाजातील ४० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून परिसरात राहणारी हिंदी भाषिक नागरिकांची ६० टक्के मुले शिक्षण घेत आहेत. एमआयडीसी भागातील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. मुंबई येथील एम्पथी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करून शाळेची दोन माजली प्रशस्त इमारत बांधून देण्यात आली आहे. दरवर्षी या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन हजार वह्यांचे वाटप केले जाते.

शाळेचे कार्यालय आणि वर्गखोल्यांमध्ये टेबल आणि खुर्च्या तसेच ५० इंचांचा एलईडी टीव्हीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव यांच्या माध्यमातून वर्गखोल्यांमधील भिंतींवर अभ्यासक्रमानुसार बोलक्या भिंतीची निर्मिती करण्यात आली आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० स्मार्ट बेंचदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांकन आणि मूल्यशिक्षणदेखील देण्यात येते.अडवली भुतावली येथील महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल आहे. विद्यार्थ्यांचा पट वाढावा तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गरीब कुटुंबातील विद्यार्थी तसेच कचरावेचक मुलांनीदेखील शिक्षण घ्यावे यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात येते. गरीब कुटुंबातील विद्यार्थी कुपोषित राहू नयेत यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना महिन्याला पाच किलो धान्य दिले जाते. महापालिका शाळेमध्ये राबविण्यात येणारे उपक्र म आणि डिजिटल शाळेमुळे परिसरातील खासगी शाळेतील विद्यार्थीदेखील महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. - भिकाजी सावंत (मुख्याध्यापक)वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेशशाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. त्यांचे संवर्धन आणि संगोपन विद्यार्थी करतात. सदर शाळा निसर्गरम्य बनविण्यात आली असून यामुळे नैसर्गिक बटरफ्लाय गार्डन तयार झाले आहे. या ठिकाणी येणाऱ्या विविध पक्ष्यांसाठी पाण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. शाळेच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या गार्डनमुळे वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेश दिला जातो. यासाठी वृक्षप्रेमी शिक्षक महेंद्र भोये, आदी शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

स्वच्छ आणि सुंदर शाळाअडवली भुतावली शाळेने कोपरखैरणे विभागातून सलग तीन वर्षे स्वच्छ आणि सुंदर शाळेचे प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले असून नवी मुंबई विभागातून दुसरा क्र मांक पटकावला आहे.

टॅग्स :digitalडिजिटलSchoolशाळा